AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar First Review: क्षणोक्षणी थरार अन् थक्क करणारे ट्विस्ट; ‘धुरंधर’चा पहिला रिव्ह्यू समोर

'धुरंधर' या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन यांच्या भूमिका आहेत. वास्तविक कथेवर हा चित्रपट आधारित असल्याचं कळतंय.

Dhurandhar First Review: क्षणोक्षणी थरार अन् थक्क करणारे ट्विस्ट; 'धुरंधर'चा पहिला रिव्ह्यू समोर
dhurandharImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 04, 2025 | 1:17 PM
Share

रणवीर सिंहसह तगडी स्टारकास्ट असलेला ‘धुरंधर’ हा बहुचर्चित चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘धुरंधर’ची अॅडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली होत आहे. अशातच या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ फेम दिग्दर्शक आदित्य धरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदित्यने पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवाद यांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे आणि त्यात मल्टीस्टारचा तडकासुद्धा आहे. ‘धुरंधर’ हा एक स्पाय ड्रामा आहे, ज्यामध्ये रणवीर सिंह एक एजंट बनून पाकिस्तानात जातो. तिथे त्याला अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि अक्षय खन्ना हे तीन खलनायक भेटतात. जबरदस्त अॅक्शन असलेल्या या चित्रपटाच्या कथानकात बरेच रंजक आणि थक्क करणारे ट्विस्ट आहेत.

प्रसिद्ध चित्रपट समिक्षक उमैर संधूने ‘धुरंधर’चा पहिला रिव्ह्यू सांगितला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘हा चित्रपट तुम्हाला शॉक आणि सरप्राइजसुद्धा देणार आहे. हा चित्रपट आऊट ऑफ सिलॅबस (चौकटीबाहेरचा) आहे. अत्यंत पॉवरफुल आणि पॉवर पॅक्ड चित्रपट आहे. तीन तासांत जबरदस्त डायलॉगबाजी, अॅक्शन स्टंट्स आणि खिळवून ठेवणारी पटकथा पहायला मिळते. रणवीर सिंहने जबरदस्त कमबॅक केला आहे. तर संजय दत्त, अक्षय खन्ना यांनी जबरदस्त स्टंट केले आहेत. क्लायमॅक्स आणि चित्रपटाच्या शेवटचा अर्धा तास तुम्हाला थक्क करतो. हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. बॉलिवूडचे सोनेरी दिवस परत आले’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.

सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धुरंधर’ या चित्रपटाचे 58 हजारांहून अधिक तिकिट्स विकले गेले आहेत. यातून 4.27 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकतो, असा अंदाज आहे.

हा चित्रपट वास्तविक कथेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये अर्जुन रामपाल हा मेजर इक्बाल नावाच्या एका आयएसआय एजंटच्या भूमिकेत आहे. त्याच्या भूमिकेची ओळखच ट्रेलरमध्ये अत्यंत हिंसक पद्धतीने करून देण्यात आली आहे. तर आर. माधवनने अजय सन्यालची भूमिका साकारली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापासून त्याची भूमिका प्रेरित आहे. अक्षय खन्ना यामध्ये रहमान डकाईच्या आणि संजय दत्त हा एसपी चौधरी अस्लमच्या भूमिकेत आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक