AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekta Kapoor: एकता कपूरला होणार अटक? अरेस्ट वॉरंटबद्दल वकिलाचं स्पष्टीकरण

एकता कपूरविरोधात अटक वॉरंट जारी? नेमकं काय आहे सत्य?

Ekta Kapoor: एकता कपूरला होणार अटक? अरेस्ट वॉरंटबद्दल वकिलाचं स्पष्टीकरण
Ekta KapoorImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 02, 2022 | 9:19 PM
Share

प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. बिहारच्या बेगुसराय इथल्या न्यायालयाने एकता कपूरच्या XXX या वेब सीरिजविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचं म्हटलं जात होतं. या सीरिजमध्ये एकताने सैनिकांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह चित्रीकरण दाखवल्याचा आरोप आहे. याविरोधात बेगुसराय न्यायिक दंडाधिकारी विकास कुमार यांनी वॉरंट जारी केला होता. आता याप्रकरणी एकताच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

एकता आणि तिची आई शोभा यांच्याविरोधातील सर्व आरोप वकिलाने फेटाळले आहेत. “एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र या वृत्तात कोणतंच तथ्य नाही. कारण एकता आणि शोभा यांना कोणतंही अटक वॉरंट मिळालेलं नाही”, असं वकिलांनी स्पष्ट केलं.

एकता कपूरच्या ‘ट्रिपल एक्स 2’ या सीरिजमधील आक्षेपार्ह चित्रणावरून हा वाद सुरू आहे. या सीरिजमध्ये दोन सैनिकांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह सीन्स दाखवण्यात आले आहेत. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर जातात, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवतात, असं चित्रण या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. यावरच नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

6 जून 2020 रोजी माजी सैनिक शंभू कुमार यांच्या वतीने सीजीएम कोर्टात एक पत्र दाखल करण्यात आलं होतं. इतरही काही सैनिकांनी एकता कपूरच्या या सीरिजविरोधात आक्षेप नोंदवला होता. या वेब सीरिजमध्ये समाजात चुकीचा संदेश पसरवला जात असल्याचा, त्याचप्रमाणे सैनिकांची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप करण्यात आला होता.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.