AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला माफ करा, मी चुकलो..; अखेर आमिर खानच्या भावाकडून पश्चात्ताप व्यक्त, नेमकं काय घडलं?

अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान याने उघडपणे त्याच्या चुका मान्य केल्या आहेत. त्याने आमिर आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. जुने सर्व वाद विसरण्यास तो तयार आहे. आमिर आणि फैजल यांच्यात खूप आधीपासून वाद होते.

मला माफ करा, मी चुकलो..; अखेर आमिर खानच्या भावाकडून पश्चात्ताप व्यक्त, नेमकं काय घडलं?
Faisal Khan and Aamir KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2026 | 9:24 AM
Share

अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान याने त्याच्या कुटुंबासोबत सुरू असलेल्या दीर्घकाळापासूनच्या वादावर अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. फैजलने उघडपणे त्याच्या चुका मान्य केल्या आणि त्याने आई, भाऊ आमिर खान, बहीण निखत आणि मेहुणा संतोष हेगडी यांची जाहीर माफी मागितली आहे. “रागाच्या आणि वेदनेच्या भरात मी सार्वजनिकरित्या ज्या काही गोष्टी बोललो, ती माझी सर्वांत मोठी चूक होती. आता मला काहीही सिद्ध करायचं नाही. मला फक्त माझ्या कुटुंबासोबत शांतता आणि नातेसंबंध टिकवून ठेवायचे आहेत”, असं तो म्हणाला.

आमिरप्रमाणेच त्याचा भाऊ फैजल खानलाही सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनवायची होती. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. फैजल आमिरसोबत ‘मेला’ या चित्रपटात दिसला होता. मात्र त्यानंतर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच कायम चर्चेत राहिला. फैजलने आमिरवर अनेक धक्कादायक आरोप केले होते. आमिरने त्याला त्याच्या मुंबईतील घरात कोंडून ठेवलं होतं, असंही त्याने याआधी म्हटलं होतं. आता उज्ज्वल त्रिवेदी यांच्याशी बोलताना फैजल खान म्हणाला, “सर्वांत आधी मला माझ्या आईची माफी मागायची आहे. मला निखतची माफी मागायची आहे. मला संतोषची माफी मागायची आहे. मी आमिरचीही माफी मागतो. रागाच्या आणि दु:खाच्या भरात मी अशा अनेक गोष्टी बोललो, ज्या मला अजिबात बोलायला नको होत्या. माझ्याच कुटुंबाविरुद्ध जाहीरपणे बोलणं ही मोठी चूक होती. मी त्या गोष्टी जाहीरपणे बोलायला नको होत्या. मी त्यांच्यासोबत बसून बोलायला हवं होतं.”

आमिर, अम्माची माफी..

“आता कोणालाही चुकीचं सिद्ध करणं हे माझं ध्येय नाही. मला कोणतीही उत्तरं नको आहेत. मी बरोबर आहे आणि समोरची व्यक्ती चूक आहे, हे मला सिद्ध करायचं नाही. सत्यापेक्षा मला शांतता हवी आहे. ज्यांनी माझ्यासोबत काहीही केलं असेल, त्याला विसरण्याचा मी निर्णय घेतला आहे. नातेसंबंध जपणं अधिक महत्त्वाचं आहे. कुराण वाचल्यानंतर मला माझी चूक उमगली. त्यात कुटुंबाशी संबंध तोडू नयेत असा सल्ला दिला होता. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधण्याचा निर्णय घेतला आहे. मी बहीण निखतला फोन केला. माझ्या आईचा आवाज ऐकून माझे डोळे पाणावले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी मुंबईला विमानाने आलो. मी आमिर आणि आईची भेट घेऊन त्यांची माफी मागितली. सर्वांनी मला प्रेमाने पुन्हा स्वीकारलं. अम्मा, निखत, संतोष आणि आमिर.. या सर्वांनी मला स्वीकारलं. आता आमच्या सर्व तक्रारी मिटल्या आहेत. तुमच्या कुटुंबातील कोणी चूक केली असेल तर उशीर करू नका. लगेच बोला किंवा माफ करा. आयुष्य खूप लहान आहे. कोणत्याही वादापेक्षा किंवा सत्य सिद्ध करण्यापेक्षा नातेसंबंध जपणं अधिक महत्त्वाचं आहे”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

Follow Us
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार