AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरेल मैफिलीचा शेवट, खय्याम यांचं निधन

गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मोहम्मद जहूर खय्याम हे भारतीय सिनेसृष्टीतील मोठं नाव होतं.

सुरेल मैफिलीचा शेवट, खय्याम यांचं निधन
| Edited By: | Updated on: Aug 19, 2019 | 10:45 PM
Share

मुंबई : भारतीय सिनेमातील दिग्गज संगीतकार खय्याम (Mohammed Zahur Khayyam) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी (Mohammed Zahur Khayyam ) अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मोहम्मद जहूर खय्याम हे भारतीय सिनेसृष्टीतील मोठं नाव होतं.

संगीत विश्व आणि खय्याम साब यांचं वेगळंच नातं होतं. वयाच्या 17 व्या वर्षी लुधियानामध्ये त्यांनी करिअरची सुरुवात केली. 1953 मध्ये रिलीज झालेल्या फुटपाथ सिनेमातील त्यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. 1961 च्या शोला और शबनम या सिनेमातून खय्याम यांना वेगळी ओळख मिळाली.

खय्याम यांनी आखिरी खत, कभी-कभी, त्रिशूल, नुरी, बाजार, उमराव जान आणि यात्रा अशा अनेक सिनेमांना संगीत दिलं. त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय. 2007 मध्ये संगीत नाटक अकादमी, तर 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

कभी-कभी आणि उमराव जान या सिनेमांसाठी खय्याम यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. विशेष म्हणजे 2007 मध्ये आलेल्या यात्रा सिनेमालाही त्यांनी संगीत दिलं होतं.

‘वो सुबह कभी तो आएगी’, ‘जाने क्या ढूंढती रहती हैं ये आंखें मुझमें’, ‘बुझा दिए हैं खुद अपने हाथों, ‘ठहरिए होश में आ लूं’, ‘ ‘शामे गम की कसम’, अशी अनेक गाणी गाजलेली आहेत.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.