AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज्यात चाललेल्या विकारी राजकारणावर तुझं काय मत?’; नेटकऱ्याला गश्मीर महाजनीचं उत्तर

अभिनेता गश्मीर महाजनीने नुकताच इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्याला महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

'राज्यात चाललेल्या विकारी राजकारणावर तुझं काय मत?'; नेटकऱ्याला गश्मीर महाजनीचं उत्तर
Gashmeer MahajaniImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2023 | 1:08 PM
Share

मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करण्यास सज्ज झाला आहे. वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्याने कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र यादरम्यान तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या सतत संपर्कात होता. इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी अनेकांनी गश्मीरला त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विविध प्रश्न विचारले. एका युजरने त्याला महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मत मांडण्यास सांगितलं.

‘महाराष्ट्राच्या राजकारणावर काय मत?’

‘सद्यस्थितीला महाराष्ट्रात चाललेल्या विकारी राजकारणावर तुमचं काय मत आहे? मान्य आहे हे तुमचं क्षेत्र नाही पण तरीही..’, असा सवाल संबंधित युजरने गश्मीरला केला. त्यावर उत्तर देताना गश्मीरने लिहिलं, ‘जे अजूनतरी माझं क्षेत्र नाही आणि ज्यातलं आता तरी मला सखोल ज्ञान नाही, त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही.’ या सेशनदरम्यान एका नेटकऱ्याने गश्मीरला ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोबद्दल प्रश्न विचारला. ‘बिग बॉस 17 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार का’, असं एकाने विचारलं.

‘बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार का?’

बिग बॉसच्या प्रश्नाचं उत्तर देताना गश्मीरने लिहिलं, ‘त्यांच्या सिझनच्या क्रमांकाशी जुळवून घेण्यासाठी माझी 17 वेळा नकार देण्याची इच्छा आहे. पण आतापर्यंत मी फक्त तीन वेळाच बिग बॉसची ऑफर नाकारली आहे.’ यावेळी एका युजरने गश्मीरला मानधनाविषयीही प्रश्न विचारला. ‘टर्कीमधील प्रसिद्ध अभिनेत्याला एका एपिसोडसाठी 52 हजार युरो मानधन मिळतं. भारतात किती मिळतं?’, असा सवाल गश्मीरला विचारण्यात आला. त्यावर त्याने लिहिलं, ‘टर्कीश शोजचे हक्क विकत घेऊन आणि त्यांना आपलंसं करण्याइतकं मानधन आम्हाला मिळतं.’

वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गश्मीर त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. 11 जुलै रोजी रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे इथल्या एका खोलीत मृतावस्थेत आढळले होते. त्यांचं निधन कार्डिॲक अरेस्टने झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर