AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरुचरण सिंग बेपत्ताप्रकरणी पोलीस पोहोचले ‘तारक मेहता..’च्या सेटवर; कलाकारांची केली चौकशी

'तारक मेहता..' मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारलेले अभिनेते गुरुचरण सिंग अजूनही बेपत्ताच आहेत. 22 एप्रिलपासून ते बेपत्ता असल्याची माहिती आहे. याप्रकरणी आता दिल्ली पोलीस थेट मालिकेच्या सेटवर पोहोचले आहेत.

गुरुचरण सिंग बेपत्ताप्रकरणी पोलीस पोहोचले 'तारक मेहता..'च्या सेटवर; कलाकारांची केली चौकशी
गुरूचरण सिंगImage Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2024 | 9:30 AM
Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंग 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. तो कुठे आहे आणि कोणत्या अवस्थेत आहे, याबद्दलची माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. गेल्या काही दिवसांपासून गुरूचरणचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांची एक टीम काम करत आहे. याप्रकरणी आता दिल्ली पोलीस मुंबईतील फिल्म सिटीमध्ये पोहोचले आहेत. फिल्म सिटीमध्ये ‘तारक मेहता..’ या मालिकेचा सेट आहे. त्यामुळे सेटवरील सहकलाकारांशी चौकशी करण्यासाठी ते तिथे पोहोचले आहेत. गुरुचरणविषयी माहिती मिळवण्यासाठी त्यांनी ‘तारक मेहता..’च्या कलाकारांची चौकशी केली.

‘तारक मेहता..’च्या सेटवर पोहोचले पोलीस

“या आठवड्यात दिल्ली पोलीस आमच्या मालिकेच्या सेटवर पोहोचले होते आणि त्यांनी गुरुचरण सिंगशी संपर्कात असलेल्या कलाकारांची चौकशी केली. प्रत्येकाने पोलिसांच्या चौकशीमध्ये सहकार्य केलं. त्याचप्रमाणे मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसकडून गुरूचरण यांचं मानधन थकविण्यात आल्याची चर्चा होती. मात्र हे पैसे खूप आधीच चुकवले गेल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं”, अशी माहिती सेटवरील सूत्रांनी ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

मालिकेच्या निर्मात्यांकडून स्पष्टीकरण

नीला फिल्म्स प्रॉडक्शनचे प्रमुख सोहिल रमाणी याविषयी म्हणाले, “चौकशीचा एक भाग म्हणून दिल्ली पोलीस मालिकेच्या सेटवर पोहोचले होते. गुरुचरण सिंग यांना आमच्याकडून कोणतेच पैसे देणं बाकी नाही हे त्यांच्या तपासात स्पष्ट झालं. तो लवकरात लवकर सापडावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत.” गुरूचरण हे दिल्लीत राहत असलेल्या त्यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी अनेकदा मुंबईहून तिथे जात असतात. मात्र शेवटच्या वेळी ते जेव्हा आईवडिलांना भेटायला गेले, त्यानंतर ते मुंबईला परतलेच नाहीत. बरेच दिवस त्याच्याशी संपर्क होत नसल्याने अखेर त्याच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी रोहित मीणा यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “आम्ही आयपीसीच्या कलम 365 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक टीम तयार केली आहे आणि आमची तांत्रिक टीम देखील या प्रकरणात काम करत आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरूचरण कुठेतरी चालत जाताना दिसतोय.”

Follow Us
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य