AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra| ‘आपल्याला जे हवं ते कधीच मिळत नाही, म्हणून…’, सवत असूनही कशा आनंदी राहतात हेमा मालिनी?

'प्रेमात सन्मान द्यावा लागतो...', पती असूनही हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याकडून ठेवल्या नाहीत कोणत्या अपेक्षा? आयुष्यभर अभिनेत्रीला करावा लागला अनेक गोष्टींचा सामना...

Dharmendra| 'आपल्याला जे हवं ते कधीच मिळत नाही, म्हणून...', सवत असूनही कशा आनंदी राहतात हेमा मालिनी?
| Updated on: Jul 07, 2023 | 10:48 AM
Share

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांनी माहिती आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्षा झाली आहेत. पण आजपर्यंत धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाने हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींचा स्वीकार केला नाही. धर्मेंद्र आज त्यांच्या पहिल्या कुटुंबासोबत राहत आहेत. हेमा मालिनी मात्र आजही तडजोड करत आयुष्य जगत आहे. अनेकदा खुद्द हेमा मालिनी यांनी त्यांच्या मनातील खंत स्पष्ट बोलून दाखवली. एवढंच नाही तर, नुकताच अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचं लग्न झालं. पण देओल कुटुंबाच्या मुलाच्या लग्नात देखील हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली उपस्थित नव्हत्या.. ज्यामुळे तुफान चर्चा रंगल्या…

दरम्यान, एक मुलाखतीत हेमा मालिनी यांनी ‘मला जे हवं होतं, ते सर्व काही मिळालं नाही…’ असं म्हणत खंत व्यक्त केली. मुलाखतीत हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं की, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात? यावर उत्तर देत हेमा मालिनी यांनी अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला. ज्यामुळे हेमा मालिनी आयुष्यात तडजोड करत ही गोष्ट तर समोर आलीच..

हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मी असं म्हणणार नाही की आनंदी आणि सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या. तरुण वयात प्रत्येक जण परफेक्ट आयुष्याचे स्वप्न पाहत असतो. पण आपल्याला जे हवं ते कधीच मिळत नाही.. हे कटु सत्य आहे आणि त्याचा काहीही अर्थ नाही…’

पुढे हेमा मालिनी यांना ‘सवत असल्यामुळे आयुष्यात अडचणी नाही आल्या?’ यावर अभिनेत्री म्हणाल्या, ‘बिलकूल नाही… याच कारणामुळे मी आज आनंदी आहे. प्रेमात तुम्ही कायम समोरच्याचं मन सांभाळत असता. कोणत्या अपेक्षा नसतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता आणि अखेर त्या व्यक्तीकडून देखील तुम्हाला फक्त प्रेम मिळतं. अपेक्षा नसतील तर छोट्या – छोट्या गोष्टींमुळे आयुष्यात अडचणी येत नाहीत..

‘एक व्यक्ती म्हणून काही गोष्टींचा आजही पश्चाताप होत आहे, पण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. जेव्हा त्यांचा विचार करते, त्यांच्या भावनांचा विचार करते, तेव्हा सगळं काही ठिक वाटतं. त्यांची अनुपस्थिती देखील… ‘ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी १९८० मध्ये लग्न केलं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. आज हेमा मालिनी त्यांच्या दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.