AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या बसचा आवाजच आला नाही, आली अन् आईला चिरडून गेली; भांडुप बस अपघातात काय घडलं? बालकलाकाराने सांगितलं

सोमवारी रात्री भांडुप येथे रेल्वे स्टेशनबाहेर झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताने सर्वांना धक्का बसला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मराठी बालकाराच्या आईचा देखील समावेश आहे.

त्या बसचा आवाजच आला नाही, आली अन् आईला चिरडून गेली;  भांडुप बस अपघातात काय घडलं? बालकलाकाराने सांगितलं
Bhandhup bus AccidentImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 31, 2025 | 1:08 PM
Share

मुंबईतील भांडुप पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर सोमवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने सर्वांनाच हादरवून टाकले. बेस्टची इलेक्ट्रिक बस नियंत्रणबाहेर जाऊन गर्दीत घुसली, त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दहापेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये मराठी मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या पूर्वा रासमची आई प्रणिता रासम यांचा समावेश आहे.

शूटिंगनंतर परतताना काळाचा घाला

अंधेरी येथे मराठी मालिकेच्या शूटिंगसाठी गेलेल्या ११ वर्षीय पूर्वा रासमसोबत तिची आई प्रणिता या दिवसभर होत्या. शूटिंग संपल्यानंतर माय-लेकी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भांडुप स्टेशनवर उतरल्या. घरी जाण्यासाठी त्या ६०६ क्रमांकाच्या बसची वाट पाहत उभ्या होत्या. मात्र, दुर्दैवाने तीच बस नियंत्रण सुटून मागून येऊन त्यांच्यावर धडकली. बसने प्रणिता यांना चाकाखाली चिरडले, तर आईला वाचवण्याचा प्रयत्न करणारी पूर्वा बाजूला फेकली गेली. पूर्वाच्या डोळ्यांसमोरच तिची आई कायमची दूर गेली. पूर्वा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी प्रणिताच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पूर्वाने आईच्या निधनाचे दुःख व्यक्त करताना इलेक्ट्रिक बसेसबाबत संताप व्यक्त केला. ती म्हणाली, “या इलेक्ट्रिक बसेसचा आवाज येत नाही. पूर्वीच्या बसेसचा आवाज यायचा, त्यामुळे लोक सावध होऊन बाजूला होत असत. पण ही बस मागून कधी आली आणि आईला चिरडून गेली ते कळालेच नाही. माझी आई परत येणार नाही, पण या बसेस लगेच बंद करा, यापुढे कोणाचाही बळी जाऊ नये!”

बस चालकावर गुन्हा दाखल, चौकशी सुरू

अपघातात बसने इतका जोरदार धक्का दिला की, जवळचा लोखंडी विजेचा खांबही वाकला. मृतांमध्ये तीन महिला आणि एक पुरुष असून, इतर मृतांची नावे वर्षा सावंत (२५), मानसी गुरव (४९) आणि प्रशांत शिंदे (५३) अशी आहेत.

बेस्ट प्रशासनाने बस चालक संतोष रमेश सावंत (५२) याला तात्काळ निलंबित केले असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, बसला तांत्रिक बिघाड होता की चालकाची चूक होती याची सखोल तपासणी सुरू आहे. बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले की, चालकाला योग्य प्रशिक्षण दिले होते की नाही, याचीही चौकशी होईल.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक