AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेटवरून पोलिसांनी सलमानसह सर्वांना नेलं अन्..; ‘हम साथ साथ है’मधील अभिनेत्याने सांगितली घटना

'हम साथ साथ है' या चित्रपटासाठी शूटिंग करताना सलमान खानवर काळवीट शिकारीचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी सेटवर नेमकं काय घडलं होतं आणि त्यानंतरचं वातावरण कसं होतं, याविषयी चित्रपटातील अभिनेत्याने सांगितलं.

सेटवरून पोलिसांनी सलमानसह सर्वांना नेलं अन्..; 'हम साथ साथ है'मधील अभिनेत्याने सांगितली घटना
Salman Khan and Mahesh ThakurImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2024 | 9:07 AM
Share

सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘हम साथ साथ है’ हा चित्रपट आजही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सलमान खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, मोहनिश बहल यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. यांसोबतच नीलम कोठारी, महेश ठाकूर, रिमा लागू आणि आलोक नाथ यांनीसुद्धा चित्रपटात काम केलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटात आनंद बाबूची भूमिका साकारलेले अभिनेते महेश ठाकूर यांनी शूटिंगदरम्यानची एक घटना सांगितली. ही घटना सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणातील आहे.

सलमान खान रात्रभर पोलीस ठाण्यात

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत महेश ठाकूर यांनी सांगितलं की, शूटिंगदरम्यान पोलिस सेटवर आले होते आणि त्यांनी सेटवरील सर्वांना पोलीस ठाण्यात नेलं होतं. त्यावेळी सेटवरील वातावरण अत्यंत वाईट होतं, असंही महेश यांनी सांगितलं. ‘हम साथ साथ है’मधील एका गाण्याचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी पोलिस सेटवर आले आणि त्यांनी प्रत्येकाला पोलीस ठाण्याला नेलं. “मी, मोहनिश बहल आणि करिश्मा कपूर त्या वादात सहभागीसुद्धा नव्हतो. त्यात फक्त पाच जणांचा समावेश होता. नंतर महिलांना पोलिसांनी सोडलं. पण माझ्या मते सलमान भाई रात्रभर पोलिसांसोबत होता. त्यानंतर त्याचे भाऊ अरबाज खान आणि सोहैल खान तिथे आले. दुसऱ्या दिवशी शूटिंगदरम्यान सलमान एकदम ठीक होता”, असं महेश ठाकूर म्हणाले.

सेटवरील वातावरण

“दुसऱ्या दिवशी जेव्हा शूटिंगला सुरुवात झाली, तेव्हा सलमान सेटवर एकदम ठीक होता. कूल डूड असल्यासारखं तो वागत होता. सैफसुद्धा सर्वसामान्यांप्रमाणे वागत होता. या घटनेनंतर ती बातमी वणव्यासारखी पसरली होती. सलमान खान आणि सैफ अली खान ही दोन नावं त्यात समाविष्ट असल्याने लोकांनी त्याचा मोठा वाद केला. पण अखेर त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पण त्यावेळी जोधपूरमधील शूटिंग रद्द करण्यात आलं होतं आणि संपूर्ण कलाकारांना माघारी पाठवलं गेलं होतं”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

त्या घटनेनंतर सेटवरील वातावरण नेहमीप्रमाणेच सर्वसामान्य होतं, असं महेश ठाकूर म्हणाले. “सर्वकाही ठीक होतं. प्रत्येकाला प्रत्येकजण माहित होतं. तुम्ही हे केलं का, असा प्रश्न कोणी कोणाला विचारलं नाही. कामातील प्रामाणिकपणा सेटवर दिसत होता. पण आम्हाला आठ दिवस अधिक शूटिंगला द्यावे लागले होते. जेव्हा केस झाली, तेव्हा तारखांमुळे आम्हाला आठ दिवस जास्त शूटिंग करावं लागलं होतं”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.