AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी 3500 केस दाखल केल्यात, त्या सर्व बॉलीवूडच्या विरोधात होत्या का ? समीर वानखेडे यांचा सवाल

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी मुंबई प्रदेश संचालक यांच्यावर बॉलीवूडला टार्गेट केल्याचे आरोप होत असतात.परंतू टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टीचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे.

मी 3500 केस दाखल केल्यात, त्या सर्व बॉलीवूडच्या विरोधात होत्या का ? समीर वानखेडे यांचा सवाल
Sameer Wankhede on Shah Rukh Khan
| Updated on: Oct 12, 2025 | 11:11 PM
Share

Sameer Wankhede : नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी मुंबई प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्यांवर मोकळेपणे चर्चा केली आहे. मुंबईत नियुक्तीला असताना त्यांच्यावर बॉलीवूडला टार्गेट केल्याचा आरोप झाला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत.मी जीवनात साडे तीन हजाराहून अधिक केस दाखल केलेल्या आहेत, त्या सर्व बॉलीवूड विरोधात होत्या का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

समीर वानखेडे यांना प्रश्न विचारला गेला की ज्या दिवसापासून ते मुंबईत आले, त्या दिवसापासूनच बॉलीवूडच्या विरोधात कारवाई सुरु केली असा आरोप फिल्म इंडस्ट्रीचे लोक करत असतात. यावर तुमचे काय उत्तर आहे यावर माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले की म्हणजे तुम्ही आणि हे लोक ( बॉलीवूड वाले ) काय अपेक्षा करता ? सोडून द्यायचे या लोकांना. जर कोणत्याही प्रकारे कायद्याचे पालन होत नसेल. काही चुकीचे घडत असेल तर माझ्याकडून ही अपेक्षा करणार की मी यांना सोडावे. किंवा कोणी अन्य अधिकारी जो आपले काम करत आहे त्याने यांना सोडून द्यावे ? असे होऊ शकत नाही.

घटनेसमोर सर्व समान

समीर वानखेडे यांनी सांगितले की संविधान आणि कायदा कोणाला खास विशेषअधिकार देत नाही. जर काही सापडले तर त्यांना कायद्याचा सामना करावा लागणार. मी माझ्या करियरमध्ये ज्या केस दाखल केल्या आहेत. त्यात हार्ड कोअर पेडलर, हार्ड कोअर स्मगलराच्या विरोधात केल्या आहेत. जेवढे मला आठवते,मी जवळपास ३५०० केस दाखल केल्या आहेत. तर त्या या तथाकथित इंडस्ट्रीज संदर्भात आहे का ? असे काही घडलेले नाही.

समीर वानखेडे यांनी सांगितले की ही बातमी मीडियात चालली कारण या तथाकथित सेलिब्रिटीजना फेस व्हॅल्यू आहे. कारवाई केली गेली याचा हा अर्थ नाही की आम्ही कोणाला टार्गेट करत आहे. किंवा मी कोणाला टार्गेट करत आहे ?

‘जवान’च्या डायलॉगवर काय म्हणाले वानखेडे ?

जवान चित्रपटात शाहरुखच्या तोंडी एक डायलॉग होता की, ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ हा डायलॉग समीर वानखेडे यांच्याशी जोडला गेला. सोशल मीडियावर दावा केला गेला ही हा डायलॉग समीर वानखेडे यांच्याविरोधात होता. त्यावर वानखेडे म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीने मी त्रस्त होत नाही. मला माहिती नाही तुम्ही कशाबद्दल विचारत आहात. मी चित्रपट आणि अशा गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही.

पुढे ते म्हणाले की दुसरी गोष्ट, ‘त्यांनी जो डायलॉग बोलला जेव्हा कोणी मला विचारले. माझे तर एवढेच मत आहे ही भाषा भारतीय संस्कृतीच्या हिशेबाने योग्य नाही. ही तर रोड साईड टाईप गोष्ट वाटते. जसे झोपड्यातील लोक बोलत असतात. आपली संस्कृती खूप महान आहे. आपण आपल्या वडीलांचे नाव देखील आदराने घेतो. त्यांना पिताजी असे म्हणतो. हे ऐकायला एकदमच सडकछाप वाटते. त्यामुळे आम्ही अशा सडकछाप गोष्टीने परेशान होत नाही.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...