AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय सलमान खानच्या नात्याबद्दल पहिल्यांच हा मोठा खुलासा, इस्माईल दरबार यांनी म्हटले, ते दोघे इतके जवळ की…

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी एकमेकांना काही वर्ष डेट केले. मात्र, एका वाईट स्थितीमध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. सलमान खान याने अजूनही लग्न केले नाही. आता नुकताच दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा झाला आहे.

ऐश्वर्या राय सलमान खानच्या नात्याबद्दल पहिल्यांच हा मोठा खुलासा, इस्माईल दरबार यांनी म्हटले, ते दोघे इतके जवळ की...
Aishwarya Rai and Salman Khan
| Updated on: Oct 09, 2025 | 11:50 AM
Share

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे एकेकाळी प्रचंड चर्चेत राहिला. ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे एका वाईट वळणार ब्रेकअप झाले. हेच नाही तर सलमान खान ऐश्वर्याला मारहाण करत आणि तिच्या चित्रपटांच्या सेटवर येऊन गोंधळ घालत असल्याचाही आरोप केला जातो. आता नुकताच अनेक वर्षानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने मोठा खुलासा केला. त्यावेळी काय घडले हे देखील स्पष्टपणे सांगितले. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्या वादावरही त्यांनी भाष्य केले.

भन्साळींसोबत सलमान खानने हम दिल दे चुके सनम या चित्रपटात काम केले. याच चित्रपटात ऐश्वर्या राय देखील होते. हा चित्रपट हीट ठरला. भन्साळींनी देवदास चित्रपटात सलमान खानला घेतले नाही. विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी म्हटले की, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट हीट ठरल्यानंतरही सलमान खान आणि भन्साळी यांच्यात खटके उडत होती.

भन्साळींनी देवदास चित्रपटामध्ये सलमान खानऐवजी शाहरुख खानला कास्ट केले. तो मोठा धक्का सलमान खानला बसला होता. त्यादरम्यानच ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या ब्रेकअपबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती आणि बातम्या देखील येत होत्या. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपनंतर आम्हालाही मोठा धक्का बसला आणि वाईट वाटले. ते दोघे खूप जास्त जवळ होते. मला वाटते की, त्यांनी भांडायला नव्हते पाहिजे.

पण ठीक आहे हा सर्वकाही आता भूतकाळ आहे. सलमान खान देखील समजदार आहे, तो देखील यावर कधीच काही बोलत नाही. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले ब्रेकअप नक्कीच आहे. सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने काही वर्षात अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या बच्चन आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.