AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय सलमान खानच्या नात्याबद्दल पहिल्यांच हा मोठा खुलासा, इस्माईल दरबार यांनी म्हटले, ते दोघे इतके जवळ की…

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी एकमेकांना काही वर्ष डेट केले. मात्र, एका वाईट स्थितीमध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. सलमान खान याने अजूनही लग्न केले नाही. आता नुकताच दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा झाला आहे.

ऐश्वर्या राय सलमान खानच्या नात्याबद्दल पहिल्यांच हा मोठा खुलासा, इस्माईल दरबार यांनी म्हटले, ते दोघे इतके जवळ की...
Aishwarya Rai and Salman Khan
| Updated on: Oct 09, 2025 | 11:50 AM
Share

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे एकेकाळी प्रचंड चर्चेत राहिला. ऐश्वर्या राय आणि सलमान खानचे एका वाईट वळणार ब्रेकअप झाले. हेच नाही तर सलमान खान ऐश्वर्याला मारहाण करत आणि तिच्या चित्रपटांच्या सेटवर येऊन गोंधळ घालत असल्याचाही आरोप केला जातो. आता नुकताच अनेक वर्षानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने मोठा खुलासा केला. त्यावेळी काय घडले हे देखील स्पष्टपणे सांगितले. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्या वादावरही त्यांनी भाष्य केले.

भन्साळींसोबत सलमान खानने हम दिल दे चुके सनम या चित्रपटात काम केले. याच चित्रपटात ऐश्वर्या राय देखील होते. हा चित्रपट हीट ठरला. भन्साळींनी देवदास चित्रपटात सलमान खानला घेतले नाही. विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी म्हटले की, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट हीट ठरल्यानंतरही सलमान खान आणि भन्साळी यांच्यात खटके उडत होती.

भन्साळींनी देवदास चित्रपटामध्ये सलमान खानऐवजी शाहरुख खानला कास्ट केले. तो मोठा धक्का सलमान खानला बसला होता. त्यादरम्यानच ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या ब्रेकअपबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती आणि बातम्या देखील येत होत्या. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपनंतर आम्हालाही मोठा धक्का बसला आणि वाईट वाटले. ते दोघे खूप जास्त जवळ होते. मला वाटते की, त्यांनी भांडायला नव्हते पाहिजे.

पण ठीक आहे हा सर्वकाही आता भूतकाळ आहे. सलमान खान देखील समजदार आहे, तो देखील यावर कधीच काही बोलत नाही. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले ब्रेकअप नक्कीच आहे. सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने काही वर्षात अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक यांची एक मुलगी असून तिचे नाव आराध्या बच्चन आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.