AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaya Bachchan: जया बच्चन एवढ्या का चिडतात? अन्नू कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन कायमच त्यांच्या रागामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांचा राग सर्वांनी पाहिला आहे. त्यांचे रागात असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात आणि त्यांच्या हा स्वभाव सर्वांना माहिती झाला आहे. आता त्यांच्या या स्वभावावर अभिनेता अन्नू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jaya Bachchan: जया बच्चन एवढ्या का चिडतात? अन्नू कपूर यांनी दिली प्रतिक्रिया
Annu Kapoor And JayaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 07, 2025 | 12:01 PM
Share

बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ते टीव्ही विश्वातील एक मोठे नाव आहे. अन्नू कपूर यांनी नुकतेच टीव्ही9 भारतवर्षच्या खास कार्यक्रम सत्ता सम्मेलनात भाग घेतला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले आणि अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एकीकडे त्यांनी आपल्या बालपणीच्या संघर्षाची आठवण काढली, तर दुसरीकडे त्यांनी राजकारणाशी संबंधित प्रश्नांमध्येही रस दाखवला. याशिवाय, अभिनेत्याला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांच्या रागाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. अन्नू कपूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.

अन्नू यांनी जयाबद्दल काय सांगितले?

सत्ता सम्मेलनात अन्नू कपूर यांना जया बच्चन यांच्या रागाबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांना जया बच्चनच्या काही क्लिप्सही दाखवण्यात आल्या. यावर अन्नू कपूर यांनी विनोदी अंदाजात सांगितले की, “मला समजले, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीबद्दल बोलत आहात ते.” पुढे अन्नू यांनी जया बच्चन यांच्या बद्दल सांगितले, “मी असं काही पाहिलं नाही. तुम्ही जे दाखवत आहात, ते तुम्ही योग्य दाखवत असाल, ज्या अँगलमधून तुम्ही दाखवलं आहे. पण जया बच्चन माझी मोठी बहीण आहे आणि मी माझ्या मोठ्या बहिणीबद्दल काही बोलणार नाही.”

वाचा: मोठी बातमी! अभिनेत्रीच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, मुंबईत रंगेहात पकडलं

चार सुपरस्टार्सपैकी कोण श्रेष्ठ?

यानंतर रॅपिड फायर राउंडमध्ये अन्नू कपूर यांना काही पर्यायी प्रश्न विचारले होते. त्यांना विचारण्यात आले की, कंगना रणौत आणि जया बच्चन यांच्यापैकी कोण उत्तम राजकारणी आहे. यावर अन्नू कपूर यांनी उत्तर दिले की, जया बच्चन त्यांची मोठी बहीण आहे आणि कंगना रणौत त्यांची छोटी बहीण आहे. यापेक्षा जास्त त्यांना काही माहिती नाही.

तसेच, त्यांना विचारण्यात आले की, दिलीप कुमार, राजेश खन्ना, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना उत्तम अभिनेत्याच्या दृष्टिकोनातून क्रमवारीत लावावे. यावेळी अन्नू कपूर यांनी अभिनयाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर दिलीप कुमार यांना ठेवले. दुसऱ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन यांना ठेवले. तिसऱ्या क्रमांकावर अन्नू यांनी शाहरुख खान यांना ठेवले आणि चौथ्या क्रमांकासाठी त्यांनी राजेश खन्ना यांची निवड केली. अन्नू कपूर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर अन्नू कपूर आता अरशद वारसी आणि अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 3’ या चित्रपटात दिसणार आहेत.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक