AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मला अशी पत्नी हवी जी..”; लग्नापूर्वी बिग बींची होती मोठी अट, 49 वर्षांनंतर जया यांचा खुलासा

आजोबांनी तुम्हाला प्रपोज कसं केलं? नातीच्या प्रश्नावर जया बच्चन यांचं उत्तर

मला अशी पत्नी हवी जी..; लग्नापूर्वी बिग बींची होती मोठी अट, 49 वर्षांनंतर जया यांचा खुलासा
Amitabh and Jaya BachchanImage Credit source: Facebook
| Updated on: Oct 30, 2022 | 1:00 PM
Share

मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या विधानांसाठी चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. बिग बींनी त्यांच्याशी लग्न करण्यापूर्वी एक मोठी अट ठेवली होती, असं जया बच्चन यांनी सांगितलं. अमिताभ आणि जया यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला आता 49 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा एक पॉडकास्ट शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. याच शोमध्ये जया यांनी हजेरी लावली होती. यावेळी शोमध्ये त्यांनी लग्नाबद्दलचा खुलासा केला. जया बच्चन यांनी सांगितलं की अमिताभ यांनी त्यांच्याशी लग्न करण्यापूर्वी असं सांगितलं होतं की त्यांना 9 ते 5 वेळेदरम्यान काम करणारी पत्नी पाहिजे.

आजोबांनी तुम्हाला प्रपोज कसं केलं होतं, असा प्रश्न नव्याने जया यांना विचारला. त्यावर त्यांनी सांगितलं, “मी कोलकातामध्ये शूटिंग करत होती. तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की जर आमचा कोणता चित्रपट हिट झाला, तर आम्ही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जाणार. त्यानंतर जंजीर हा चित्रपट हिट ठरला. मी कोलकातामध्ये शूटिंगसाठी गेली होती, तेव्हा तुझ्या आजोबांनी कॉल करून मला सांगितलं की, एक समस्या आहे.”

“तुझ्यासोबत बाहेर फिरायला जाण्यासाठी माझ्या पालकांनी नकार दिला आहे. जर तुला जयासोबत फिरायला जायचं असेल तर तिच्याशी लग्न कर, असं ते म्हणाले. तेव्हा त्यांनी (अमिताभ) मला विचारलं की तुझा काय विचार आहे? मी म्हटलं, आपण जर ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा विचार करत होतो, तर जूनमध्येच करू”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

एकत्र फिरायला जाण्यासाठी जया आणि अमिताभ बच्चन यांनी लग्नाच्या ठरलेल्या तारखेआधीच लग्नगाठ बांधली होती. लग्नापूर्वी बिग बींनी ठेवलेल्या अटीबद्दल सांगताना जया पुढे म्हणाल्या, “ऑक्टोबरपर्यंत माझं काम कमी होईल, या विचाराने आम्ही लग्नाचा महिना तो ठरवला होता. मात्र त्यावर अमिताभजी मला म्हणाले होते की, मला अशी पत्नी पाहिजे, जी 9 ते 5 वेळेदरम्यान काम करेल. तुला दररोज काम करण्याची गरज नाही. तू तुझे प्रोजेक्ट्स, काम योग्य व्यक्तींसोबत केले पाहिजेस.” या अटींना मंजूर केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

अमिताभ बच्चन आणि जया यांनी 1973 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या एक वर्षानंतर जया यांनी श्वेताला जन्म दिला. त्यानंतर 1976 मध्ये अभिषेकचा जन्म झाला.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.