AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोणचं विकून पोट भरतेय कपूर कुटुंबाची लहान सून, 2 वर्षात मोडला संसार, संपवलं कपूर कुटुंबाशी असलेलं नातं

कपूर कुटुंबाची लहान सून लोणचं विकून जगतेय आयुष्य... लग्नाच्या दोन वर्षांत नवऱ्याने सोडली साथ... त्यानंतर तिने संपवलं कपूर कुटुंबाशी असलेलं नातं... कपूर कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...

लोणचं विकून पोट भरतेय कपूर कुटुंबाची लहान सून, 2 वर्षात मोडला संसार, संपवलं कपूर कुटुंबाशी असलेलं नातं
| Updated on: Apr 12, 2025 | 1:12 PM
Share

Rajiv Kapoor-Aarti Sabharwal tragic life: बॉलिवूड फिल्म विश्वातील पहिले शोमॅन राज कपूर यांच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओखळ निर्माण करणारे राज कपूर यांनी तीन मुलं होती. रणधीर कपूर, ऋषी कपूर कायम प्रकाशझोतात राहिले, पण राजीव कपूर यांना फार कमी ओळखतात. ज्याचं कारण आहे बॉलिवूडमधील त्यांचं फेल झालेलं करीयर. राजीव कपूर यांच्या प्रोफेशनल आयुष्यामध्येच नाही तर, खासगी आयुष्यात देखील अनेक चढ – उतार आले.

2001 मध्ये राजीव कपूर यांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 2 वर्षात राजीव कपूर यांचं लग्न घटस्फोटोपर्यंत पोहोचलं. त्यानंतर राजीव कपूर यांनी पुन्हा लग्न करण्याचा विचार केलाच नाही. राज कपूर यांनी मुलगा राजीव कपूरला ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं. राजीव कपूरचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आणि लोकांना त्याला अभिनेता म्हणून स्वीकारण्यास जास्त वेळ लागला नाही. असं असताना देखील राज कपूर यांचं बॉलिवूड करीयर हीट ठरलं नाही.

पहिल्या सिनेमातून यश मिळाल्यानंतर राज कपूर यांचे पुढील सिनेमे चाहत्यांचं मनोरंजन करु शकलं नाहीत. अशात राज कपूर यांनी देखील मुलासाठी सिनेमे तयार करणं बंद केलं. यामुळे राज कपूर प्रचंड नाराज झाला. यावरून अनेकदा त्यांची वडिलांसोबत भांडणं देखील झाली आहेत.

सिनेमात करीयर करत असताना राजीव यांच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली. अभिनेत्री दिव्या यांच्या प्रेमात राजीव कपूर होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहिलं प्रेम अपूर्ण राहिल्यानंतर राजीव कपूर यांनी आरती सभरवाल यांच्यासोबत लग्न केलं. 2001 मध्ये आरती आणि राजीव यांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं दोन वर्ष देखील टिकलं नाही.

राजीव कपूर यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर आरती यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. शिवाय स्वतःचा व्यवसाय देखील सुरु केला. एक-दोन व्यवसाय फारसे चांगले झाले नाहीत पण नंतर आरती यांनी लोणचे बनवणारी कंपनी उघडली आणि त्यानंतर त्यांचे नशीब बदलले. आरती सभरवाल आज एक यशस्वी उद्योजिका आहे.

राजीव कपूर यांचं निधन

राजीव कपूर यांना 9 फेब्रुवारी 2021 रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. राज कपूर यांचा तिसरा मुलगा अनेक वर्षे दुर्दैवी जीवन जगल्यानंतर हे जग सोडून गेला. लोक राजीव कपूर यांचं नावही घेत नाहीत कारण त्यांनी बॉलिवूडला हीट सिनेमे दिले नाहीत आणि त्यांना मुलेही नाहीत.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.