मुंबई: गेल्या वर्षभरात बॉलिवूडचे मोजकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. बिग बजेट, मोठे कलाकार असूनही काही चित्रपट दणक्यात आपटले. हिंदी चित्रपटसृष्टीला नेमकं काय झालंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला. गेल्या काही दिवसांत निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने जितक्या मुलाखती दिल्या, त्यात त्याने बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतल्या कलाकारांविषयी मोकळेपणे मतं मांडली. कलाकारांच्या मानधनाविषयीही तो व्यक्त झाला होता. “कोरोना आणि लॉकडाऊननंतर चित्रपटांचा व्यवसाय कमी झाला. तरीसुद्धा अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपली फी कमी करण्याऐवजी वाढवली आहे”, असंही तो म्हणाला होता.