AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचा 43 व्या वर्षी मृत्यू, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलेलं? फोटो समोर

मालिकेचं शुटिंग सुरु असताना प्रसिद्ध अभिनेत्याचं समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे... वयाच्या 43 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे... ज्यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... अभिनेत्यासोबत शेवटच्या क्षणी काय घडलं जाणून घ्या...

समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचा 43 व्या वर्षी मृत्यू, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलेलं? फोटो समोर
| Updated on: Mar 30, 2026 | 10:25 AM
Share

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. समुद्रात बुडून एका 43 वर्षीय अभिनेत्याचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या अकस्मित निधनाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे… आता अभिनेत्याच्या शेवटच्या क्षणांचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये अभिनेता शुटिंग करताना दिसत आहे. ज्या अभिनेत्याचं निधन झालं आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, प्रसिद्ध बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडीशा येथील तलसारी बिचवर शुटींग करत असताना अभिनेत्याचं निधन ढालं आहे…

सध्या अभिनेत्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेता शुटिंग करताना दिसत आहे. फोटो मृत्यूच्या काही वेळ आधीचे असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर सेटवरील प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे… विशेषतः अभिनेत्यासोबत काम करत असलेली अभिनेत्री श्वेता मिश्रा हिची अवस्था पाहिल्यानंतर प्रत्येक जण भावूक होत आहे…

शुटिंग दरम्यान घडली घटना…

समोर येत असलेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय अभिनेता राहुल बॅनर्जी रविवारी म्हणजे 29 मार्च रोजी टीव्ही मालिका ‘भोले बाबा पार करेगा’ चं शुटिंग करत होता. शुटिंगच्या एका सीनमध्ये अभिनेत्याला पाण्यात उतरायचं होतं. असं देखील सांगण्यात येत आहे की, सीन पूर्ण झाल्यानंतर अभिनेता पाण्यात गेला. त्यानंतर पाण्यातून अभिनेता जिवंत परतला नाही…

समुद्रा बुडण्यापूर्वीचा सीन…

राहुल याच्या शुटिंग दरम्यानचे काही फोटो सध्या चर्चेत आले आहे… पाण्यात जाण्यापूर्वी त्याने एक सीन शूट केलेला. तो सीन अभिनेत्याचा शेवटचा सीन असल्याचं आता सांगण्यात येत आहे… जेव्हा अभिनेता समुद्रात उतरला, तेव्हा जोरदार लाटांमुळे किंवा पाण्याच्या खोलीमुळे अभिनेत्याचा बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला सेटवर असलेल्यांना परिस्थिती इतकी गंभीर होईल याची कल्पना नव्हती. पण उशीर झाला तरी अभिनेता परत आला नसल्याने खळबळ माजली… त्यानंतर असं काही घडेल त्याची कल्पना कोणीच केली नसेल. अभिनेत्याच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली…

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.