AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150 वेळा केला बदल, बनवण्यासाठी लागली 2 वर्षे, बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं हे गाणं, 65 वर्षांपूर्वी आलेला 1 कोटी खर्च

150 वेळा एडिट, बनवण्यासाठी लागली होती 2 वर्षे. बाथरुममध्ये रेकॉर्ड केलं होतं गाणं. ज्याला बनवण्यासाठी 65 वर्षांपूर्वी आला होता 1 कोटी खर्च. आजही ते गाणं प्रचंड लोकप्रिय.

150 वेळा केला बदल, बनवण्यासाठी लागली 2 वर्षे, बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं हे गाणं, 65 वर्षांपूर्वी आलेला 1 कोटी खर्च
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 01, 2026 | 11:21 AM
Share

Bollywood Movies : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला. अशा चित्रपटांमधील काही सीन हे इतके गाजले की त्यांची आजही चर्चा होते. असाच एक चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिस गाजवलं त्यासोबत आजही ही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झाला आणि आजही तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

भव्य सेट्स, दमदार संवाद, अजरामर संगीत आणि जबरदस्त अभिनय यामुळे हा चित्रपट आजही तितकाच प्रेक्षकांना आवडतो. तब्बल 65 वर्षांपूर्वी तयार झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील प्रत्येक गाणे आजही क्लासिक मानले जाते. मात्र, त्यातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणे विशेषतः प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवून आहे. मधुबालाच्या सौंदर्याने, लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजाने आणि नौशाद यांच्या अजरामर संगीताने सजलेले हे गाणे आजही ऐकले की अंगावर रोमांच उभे राहतात.

भव्य सेट आणि अभूतपूर्व खर्च

हे गाणे मोहन स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेल्या एका भव्य सेटवर चित्रित करण्यात आले होते. हा सेट तब्बल 150 फूट लांब, 80 फूट रुंद आणि 35 फूट उंच होता. विशेष बाब म्हणजे या एका गाण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. त्या काळात या सेटसाठी 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला होता, जो त्या वेळच्या कोणत्याही हिंदी चित्रपटाच्या एकूण बजेटपेक्षाही जास्त होता. आजच्या काळात जर या गाण्याचे चित्रीकरण झाले असते तर त्याचा अंदाजे खर्च सुमारे 55 कोटी रुपये झाला असता असे इंडस्ट्रीतील तज्ज्ञ मानतात.

शकील बदायूनी यांनी या गाण्यासाठी अफाट मेहनत घेतली. नौशाद यांनी गाण्याच्या प्रत्येक ओळीवर बारकाईने लक्ष दिले आणि अंतिम स्वरूप देण्याआधी गीतामध्ये अनेकदा बदल करून घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे, हे गाणे मंजूर होईपर्यंत त्यात सुमारे 150 वेळा एडिटिंग करण्यात आली होती.

या गाण्याला अमर करणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजातून या गीताला वेगळीच उंची दिली. विशेष म्हणजे या गाण्यात इको इफेक्ट वापरण्यात आला होता, जो त्या काळात अत्यंत दुर्मिळ मानला जात होता. नौशाद काहीतरी वेगळे करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी लता मंगेशकर यांना थेट बाथरूम स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड करण्यास सांगितले, जेणेकरून गाण्याला नैसर्गिक आणि खोल इको इफेक्ट मिळू शकेल.

Follow Us
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर