AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महावतार नरसिम्हा’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये मुस्लिमांची गर्दी; दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर

25 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'महावतार नरसिम्हा' या चित्रपटाला तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी मुस्लीम प्रेक्षकसुद्धा थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

'महावतार नरसिम्हा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये मुस्लिमांची गर्दी; दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया समोर
महावतार नरसिम्हाचे दिग्दर्शक अश्विन कुमारImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 11, 2025 | 11:36 AM
Share

प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांनंतरही ‘महावतार नरसिम्हा’ हा ॲनिमेटेड चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहे. भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली असून काही ठिकाणी तर थिएटरचं अक्षरश: मंदिरात रुपांतर झालं आहे. आपला निस्सिम भक्त प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी आणि असूर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवान विष्णू नरसिम्हाचा अवतार घेतात. अनेक बंधनं बाजूला सारून विविध धर्माचे प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काही मुस्लीम प्रेक्षकसुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी येत असून त्यांनाही ‘महावतार नरसिम्हा’ प्रचंड आवडत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

‘केजीएफ’, ‘कांतारा’, ‘सलार’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या ‘होम्बाले फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. याच प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरअंतर्गत ‘महावतार नरसिम्हा’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अश्विन कुमार म्हणाले, “हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक एकदा नाही तर दोनदा, तीनदा थिएटरमध्ये पोहोचत आहेत. यामध्ये अनेक मुस्लीम प्रेक्षकांचाही समावेश आहे. विविध समुदायाच्या लोकांना हा चित्रपट आवडतोय. या चित्रपटाने त्यांच्या विश्वासाला अधिक मजबूत केल्याची भावना या लोकांनी माझ्यासमोर व्यक्त केली आहे.”

“तुम्ही तुमचा धर्म बदला, असं मी म्हणत नाहीये. मला इतकंच सांगायचं आहे की आस्था काय असते, हे तुम्ही समजून घ्या. मग तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल किंवा सकारात्मक ऊर्जेवर किंवा ब्रह्मांडावर. त्या आस्थेसमोर तुम्ही स्वत:ला समर्पित करा, हेच या चित्रपटातून शिकायला मिळतं”, असं त्यांनी सांगितलं. बॉक्स ऑफिसवर एकीकडे ‘सैयारा’ची त्सुनामी सुरू असतानाच ‘महावतार नरसिम्हा’च्या कलेक्शनने सर्वांनाच चकीत केलं. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने 27 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. रक्षाबंधनच्या सुट्टीचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत कमाईचा आकडा 50 कोटींपर्यंत पोहोचू शकतो. या चित्रपटाने गेल्या 16 दिवसांत 145 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘महावतार नरसिम्हा’ हा होम्बाले फिल्म्सच्या फ्रँचाइजीमधील पहिला चित्रपट आहे. यानंतर 2027 मध्ये ‘महावतार परशुराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा आणखी चार ते पाच चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.