AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नामों निशान मिटा देंगे! भारतात आता दिसणार नाहीत पाकिस्तानी कलाकार, घेतला मोठा निर्णय

Pakistani Stars Erased From Bollywood: नामों निशान मिटा देंगे! भारत सरकार आणि लष्कराविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य पाकिस्तानी कलाकारांना पडलं महागात, घेण्यात आला मोठा निर्णय

नामों निशान मिटा देंगे! भारतात आता दिसणार नाहीत पाकिस्तानी कलाकार, घेतला मोठा निर्णय
| Updated on: May 13, 2025 | 3:51 PM
Share

Pakistani Stars Erased From Bollywood: पाकिस्तानी कलाकार माहिरा खान आणि फवाद खान यांनी अलीकडच्या काळात भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं. भारताविरोधात वक्तव्य करणं आता पाकिस्तानी कलाकारांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे भारतीय जनतेमध्ये आणि बॉलिवूडमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं. भारतीय कलाकारांनी माहिरा आणि फवादला चोख प्रत्युत्तर दिलं, मात्र आता त्यांच्याविरुद्ध घेतलेली कारवाई त्यांना आयुष्यभर लक्षात राहील, असं चित्र देखील दिसतं आहे.

फवाद खान आणि माहिरा खान यांच्या हिंदी सिनेमांमधील गाण्यांचे पोस्टर्स होते, त्यावरून त्यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. ही फक्त एक कारवाई नाही तर, भारतात देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या कुणालाही सहन केलं जाणार नाही… असं देखील स्पष्ट दिसून आलं आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘कपूर अँड सन्स’ आणि ‘रईस’ मध्ये काम केलेले फवाद आणि माहिरा भारत सरकार आणि सैन्याविरुद्ध अपमानजनक टिप्पणी करताना दिसले. या दोन्ही कलाकारा प्रत्युत्तर देत, म्युझिक अॅप्सवरील गाण्यांच्या पोस्टर्सवरून त्यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत.

सांगायचं झालं तर, आधी माहिरा आणि शाहरुख दोघांचे फोटो पोस्टरवर होते, पण आता अल्बमच्या कव्हरवर फक्त किंग खान दिसतो. ‘कपूर अँड सन्स’ मधील फवाद खानवर चित्रित केलेले “बुद्धू सा मन” हे गाणे सध्या भारतात उपलब्ध नाही. पाकिस्तानी कलाकारांचे काही गाणी अद्यापही उपलब्ध आहे. पण त्यांच्यावर देखील बंदी घातली जाऊ शकते… याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑपरेश सिंदूर…

ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने पाकिस्तानला चेतावणी दिली की जर त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले नाही, तर भारत पुन्हा लष्करी कारवाई करू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात राष्ट्रीय भाषणात स्पष्ट केले की सध्याचा संघर्ष फक्त एक तात्पुरता विराम आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला, त्यात 25 भारतीय पर्यटक आणि 1 स्थानिक नागरिकाचा समावेश होता. याचाच बदल म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आलं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...