AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनिषा कोईरालाकडून आई होऊ न शकल्याचं दु:ख व्यक्त; सांगितलं मूल दत्तक न घेण्यामागचं कारण

2012 मध्ये मनिषाला गर्भाशयाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर तिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले आणि 2014 मध्ये ती कॅन्सरमुक्त झाली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मनिषाने अभिनयक्षेत्रात पुनरागमन केलं. सध्या 'हिरामंडी'मधील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

मनिषा कोईरालाकडून आई होऊ न शकल्याचं दु:ख व्यक्त; सांगितलं मूल दत्तक न घेण्यामागचं कारण
Manisha Koirala Image Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2024 | 12:33 PM
Share

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मनिषा कोईरालाने दमदार भूमिका साकारली. मनिषाने या सीरिजमध्ये आईची भूमिका साकारली असली तरी तिच्या भूमिकेला थोडीशी नकारात्मक छटा आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनिषा खऱ्या आयुष्यात आई होण्याच्या इच्छेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “मी खऱ्या आयुष्यात आई होऊ शकत नाही, या गोष्टीला मी आता स्वीकारलं आहे आणि त्यातच समाधान मानलं आहे”, असं ती म्हणाली. मनिषाला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. त्यावर तिने यशस्वीरित्या मात दिली.

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “माझ्या आयुष्यात काही पूर्णत्वास न गेलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही जसजसे मोठे होता, तसतसं रिअॅलिटीला स्वीकारता. अशी अनेक स्वप्नं असतात, ज्या कधीच पूर्ण होणार नाहीत हे तुम्हाला माहित असतं. त्यामुळे ती गोष्ट किंवा परिस्थिती तुम्ही आहे तशी स्वीकारता. माझ्यासाठी मातृत्त्व ही गोष्ट त्यापैकीच एक आहे. गर्भाशयाचा कर्करोग आणि त्यानंतर आई न होऊ शकणं या गोष्टींचा स्वीकार करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण आता मी ती परिस्थिती स्विकारली आहे आणि त्यातच समाधान मानलं आहे. जे गेलं ते गेलं. आता माझ्या हातात जे आहे, त्यातून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन.”

View this post on Instagram

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

या मुलाखतीत मनिषाला मूल दत्तक घेण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी तिने पुढे सांगितलं, “मी दत्तक घेण्याविषयी खूप विचार केला. पण नंतर मला जाणवलं की मी छोट्या छोट्या गोष्टींचा खूप ताण घेते. मला लगेच टेन्शन येतं. त्यामुळे बऱ्याच चर्चेनंतर मी मूल दत्तक न घेण्याचा निर्णय घेतला. त्यापेक्षा मी गॉडमदर होईन. माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्यातच मी समाधान मानलं आहे. माझे वृद्ध आईवडील माझ्यासोबत आहेत. त्यांच्यावर मी खूप प्रेम करते. त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासोबत राहीन आणि त्यांची काळजी घेईन. नेपाळला जाऊन मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवते.”

‘हिरामंडी’ ही सीरिज प्रदर्शित होण्याआधी मनिषाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. ‘माझ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या करिअरमध्ये मला उल्लेखनीय भूमिका साकारायला मिळाल्या, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि अवघड काळात मैत्रीने खूप साथ दिली. देवाच्या कृपेने मला कॅन्सरनंतर जणू दुसरा जन्मच मिळाला आहे. माझ्या आयुष्यात मी काही कठीण प्रसंगही पाहिले आहेत. आता मला वेळेचं महत्त्व खूप जाणवू लागलं आहे’, असं तिने लिहिलं होतं.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.