AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन वर्षांत घटस्फोट, कॅन्सरशी झुंज; आता वयाच्या 53 व्या वर्षी मनीषा कोइराला दुसऱ्या पार्टनरच्या शोधात?

अभिनेत्री मनीषा कोइरालाने 2010 मध्ये नेपाळी बिझनेसमनशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनीषा दुसऱ्यांदा पार्टनर शोधण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

दोन वर्षांत घटस्फोट, कॅन्सरशी झुंज; आता वयाच्या 53 व्या वर्षी मनीषा कोइराला दुसऱ्या पार्टनरच्या शोधात?
मनिषा कोइरालाImage Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2024 | 12:45 PM
Share

अभिनेत्री मनीषा कोइरालाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजपासून (1 मे) पहायला मिळेल. मनीषाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांसोबतच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. ‘हिरामंडी’च्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत मनीषा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटाविषयी बोलतानाच मनीषाने आयुष्याच्या या टप्प्यावर असताना दुसरं प्रेमाच्या प्रतीक्षेत आहेत का, याविषयी सांगितलं.

‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनीषा म्हणाली, “काही लोक आयुष्यात खूप नशिबवान असतात, ज्यांना फारसे चढउतार पहायला मिळत नाहीत. अत्यंत सुखाने आणि शांतीने ते त्यांचं आयुष्य जगतात. मीसुद्धा नशिबवान आहे की मला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. मी फक्त अशी आशा करते की यामुळे माझ्या मनात आयुष्याबद्दल कटुता निर्माण होणार नाही.” या मुलाखतीत मनीषाने हेसुद्धा सांगितलं की ती घटस्फोटादरम्यान कशी स्ट्राँग राहिली आणि त्यानंतर कॅन्सरशी यशस्वी झुंज कशी दिली? “परिस्थितीला मी कशी बदलू शकते हे माझं काम आहे. आयुष्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पहायचं, ते माझ्यावर आहे. ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा.. यातलं काय पहायचं? मी माझ्या आयुष्याला त्रासदायक समजते का? तर नाही. उलट अशा परिस्थितीतून मी आयुष्याबद्दल नवीन गोष्टी शिकत पुढे जाते”, असं ती पुढे म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

एंग्झायटी अटॅक्स येत असल्याचाही खुलासा मनीषाने या मुलाखतीत केला. “मला एंग्झायटी अटॅक यायचे आणि मला लगेच असुरक्षित वाटायचं. लोकांकडे ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व माझ्याकडे होत्या. तरीही मी नैराश्यात होती आणि मला स्वत:विषयी फार वाईट वाटायचं. अशा वेळी मी स्वत:ला म्हणायची की नाही मनीषा उठ आणि चालायला लाग. मला वाटतं की जेव्हा तुम्ही आयुष्यात अशा अनेक गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवतं की आयुष्याची ही दुसरी बाजू आहे. अशा वेळी तुम्ही स्वत:ला उभं करा आणि चालायला लागा”, असं मनीषा म्हणाली.

या वयात दुसऱ्या पार्टनरच्या शोधात आहेस का, असा प्रश्न मनीषाला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिलं, “जर मी नाही असं म्हटलं तर ते खोटं ठरेल. माझ्या आयुष्यात एखादा जोडीदार किंवा पार्टनर असावा असं मला वाटतं. जर तो पार्टनर आयुष्यात असेल तर चांगलीच गोष्ट असते. पण त्यासाठी मी प्रतीक्षा करत माझा वेळ वाया घालवणार नाही. माझ्या नशिबात असेल तर तो मला भेटेल. जर नसेल तरी ठीक आहे. सध्या मी माझं आयुष्य मनमुराद जगतेय.” मनीषाने 2010 मध्ये नेपाळी बिझनेसमन सम्राट दहलशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.