AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मन उडु उडु झालं’ फेम अभिनेत्याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी बांधली लग्नगाठ; पहा फोटो

नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्याच्या दोन दिवसांनी ऋतुराज आणि रिसबुद लग्नबंधनात अडकले. ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'मन उडु उडु झालं' फेम अभिनेत्याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी बांधली लग्नगाठ; पहा फोटो
'मन उडु उडु झालं' फेम अभिनेत्याने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी बांधली लग्नगाठImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 30, 2023 | 6:31 PM
Share

मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘मन उडु उडु झालं’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारलेला अभिनेता ऋतुराज फडके याने नुकतीच लग्नगाठ बांधली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि क्रिएटर प्रीती रिसबूद हिच्याशी त्याने लग्न केलं. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्याच्या दोन दिवसांनी ऋतुराज आणि रिसबुद लग्नबंधनात अडकले. ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

27 जानेवारी रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. ‘सर्वसामान्य आयुष्य जगत असताना कधीतरी प्रेम तुम्हाला परीकथेसारखे क्षण देऊन जातं’, असं कॅप्शन देत ऋतुराजने हे फोटो पोस्ट केले आहेत. यासोबतच त्याने प्रीतीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती उखाणं घेताना दिसत आहे. प्रीतीचं उखाणं ऐकून चाहत्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

‘लग्न करून माहेर सोडताना थोडंसं दु:ख जरी झालं.. ऋतुराजरावांचं नाव घेऊन मन उडु उडु झालं’ असं उखाणं प्रीतीने घेतलं. लग्नसोहळ्यात ऋतुराजने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. तर प्रीतीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

ऋतुराजच्या लग्नाला ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतील कलाकारही उपस्थित होते. याच मालिकेतून ऋतुराजला प्रसिद्धी मिळाली. यामध्ये त्याने खलनायकी भूमिका साकारली होती. तर ऋतुराजची पत्नी प्रीती ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि क्रिएटर आहे. प्रीतीचं युट्यूब चॅनल असून त्यावर ती विविध व्हिडीओ पोस्ट करते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.