AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, संतापलेला अभिनेता म्हणतो, ‘कायद्याचा धाक राहिलेला नाही…’

Mumbai Jogeshwari Rape Case: 'कायद्याचा धाक राहिलेला नाही...', मुंबईत 12 वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्कार, तीन दिवस मुलगी होती गायब, घटना समोर आल्यानंतर माजली सर्वत्र खळबळ

मुंबईत 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, संतापलेला अभिनेता म्हणतो, 'कायद्याचा धाक राहिलेला नाही...'
फोटो सौजन्य - फाईल फोटो
| Updated on: Mar 07, 2025 | 12:40 PM
Share

पुण्यातील स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरण ताजं असताना मुंबईत 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीतिच्या नातेवाईकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी भागात राहत होती. घरात भांडण झाल्यामुळे घर सोडून निघालेली मुलगी घरी परतली नसल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्या 12 वर्षीय मुली पाच जणांनी आळीपळीने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्यानंतर संपूर्ण मुंबई हादरली आहे. घडलेल्या घटनेवर मराठी अभिनेत्याने देखील संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने कोणालाच कायद्याचा धाक राहिलेल्या नाही… असं म्हटलं आहे.

अभिनेता अक्षय केळकर हीच बातमी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हणाला, “आता हे अती झालं. कायद्याचा धाक राहिला नाही कोणालाच…मेट्रो सिटीमध्ये ही परिस्थिती तर बाहेर अशा बऱ्याच गोष्टी असतील…#भीषण…” सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. 12 वर्षीय मुलीवर झालेल्या घटनेनंतर महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई आता खरंच महिलांसाठी सेफ आहे का? असा प्रश्न सतत उपस्थित होत आहे.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, एका एसी मॅकेनिकने मुलीचं अपहण केलं. मुलीला एकटी पाहून आरोपींनी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागात असलेल्या त्याच्या घरी नेले. जिथे तीन जणांनी मुलीवर आळीपाळीने अत्याचार केले. त्यानंतर दोघांनी मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर दादर स्थानकावर मुलली पोलिसांना सापडली. याप्रकरणी पोलिसांनी पाचही अरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

यापूर्वी 3 फेब्रुवारी रोजी वांद्रे टर्मिनस स्थानकावर एका महिलेवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी याप्रकरणी एरा कुलीला अटक केली. आरोपी महिलेला रिकाम्या ट्रेनमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला तिच्या सुनेसोबत मुंबईला फिरायला आली होती.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ