AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manipur | ‘…ते बघणारा अख्खा एक समुह असतो!’, मणिपूर प्रकरणावर हेमांगी कवी हिची स्पष्ट भूमिका

मणिपूर घटनेवर अभिनेत्री हेमांगी कवी हिने लिहिली लक्षवेधी पोस्ट... तिच्या पोस्टवर नेटकरी देखील कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा

Manipur | '...ते बघणारा अख्खा एक समुह असतो!', मणिपूर प्रकरणावर हेमांगी कवी हिची स्पष्ट भूमिका
| Updated on: Jul 22, 2023 | 3:17 PM
Share

मुंबई | 21 जुलै 2023 : संपूर्ण देशात मणिपूरच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आलं. त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. आता जवळपास अडीच महिन्यानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकरणाचे देशभर पडसाद उमटताना दिसत आहेत.  गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूर येथून हिंसाचाराचे प्रकरणं समोर येत आहेत. तर अनेकांनी यामध्ये स्वतःचे प्राण देखील गमावले आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देत अत्याचाऱ्यांना कदापि माफ करणार नाही, असा इशारा दिला. एवढंच नाही सेलिब्रिटी देखील यावर स्वतःची स्पष्ट भूमिका मांडत आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील मणिपूरच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मणिपुर घटना!!! कधी थांबणार हे आणि कसं? सुन्न व्हायला होतं! हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं असतील पण ते बघणारा अख्खा एक समुह असतो! त्या दोघा तिघांना अडवणारं त्यातलं कुणीच नसतं? बाप रे! इथं social media वर त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही वगैरे अगदी बरोबर आहे पण जशी ती clip आणि बातमी पसरतेय तसंच थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर?’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. अशात भारत देशात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं वारंवार दिसून येत आहे. मणिपूरच्या घटनेमुळे तर सर्वत्र खळबळ माजली आहे. मणिपूर घटनेतील एकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. पण देशभर मात्र संतापाली लाट उसळली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर स्वतःची भूमिका ठामपणे मांडत असते. मणिपूर घटनेवर अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट लक्षवेधी आहे. तिच्या पोस्टवर नेटकरी देखील कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार सुरु होते. मणिपूरमध्ये होणाऱ्या हिंसाचारावर सरकारने कोणतंही पाऊल उचललं नाही. यावर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं. “दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात येत असल्याचा व्हिडीओ अस्वस्थ करणारा असून केंद्र आणि राज्य सरकारने ठोस कारवाई करावी, अन्यथा न्यायालय हस्तक्षेप करेल”, असं न्यायालयाने बजावलं.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.