AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोक्यावर पदर अन् मुखी लावणीचे ठसठशीत बोल, लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन

लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन

डोक्यावर पदर अन् मुखी लावणीचे ठसठशीत बोल, लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 10, 2022 | 1:49 PM
Share

मुंबई : लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन (Sulochana Chavan Passed Away) झालंय. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 12 च्या सुमारास मुंबईतील फणसवाडीतील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने लावणीचा ठसकेबाज आवाज हरपल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होतेय. लावणीला ठसकेबाज सूरात लोकांपर्यंत पोहचवण्यात सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) अतुलनीय योगदान राहिलं. त्यांच्या जाण्याने कलाविश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यामुळे लावणीचा ठसकेबाज आवाज हरपल्याची भावना कलाविश्वातून व्यक्त होतेय.

सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता मुंबईच्या मरीन लाईन्स इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

सुलोचना चव्हाण यांची लावणी लोकांच्या पसंतीस उतरत होती. लावणी गायिका अशी ओळख घेऊन जगणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या डोक्यावरचा पदर कधीही खाली सरकला नाही. डोक्यावर पदर अन् मुखी लावणीचे ठसठशीत बोल अशी त्यांची प्रतिमा लावणी रसिकांच्या मनावर चिरंतन कोरलेली राहील.

सुलोचना चव्हाण यांची गायकी आणि जयश्री गडकरी यांचं सादरीकरण ज्या लावणीला लाभलं ती लावणी अजरामर झाली. या जोडीला एकत्र अनुभवनं म्हणजे लावणीचा परिपूर्ण अनुभव घेणं होतं.

ज्या काळात तमाशापटांना एक वेगळी उंची होती. त्याकाळी सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावण्या लोकांच्या मनात घर करू लागल्या अन् आजही त्यांची लावणी मनाला मोहिनी घालते.

सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या काही लावण्या

तुझ्या उसाला लागेल कोल्हा…

पाडाला पिकलाय आंबा

फड साभांळ तुऱ्याला गं आला

मला म्हणत्यात पुण्याची मैना

पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा

कसं काय पाटील बरं हाय का?

सुलोचना चव्हाण यांचा जीवनप्रवास

सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 ला मुंबईतील गिरगावमध्ये झाला. त्यांनी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलं.  मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती नाटकांमध्ये त्यांनी बालकलाकाराच्या भूमिकाही केल्या. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गायकीला सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी मन्ना डे यांच्यासोबत भोजपुरी रामायण गायलं.  12 ऑगस्ट 1953 ला त्यांनी श्यामराव चव्हाण यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या आधी त्यांनी 70 हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं होतं. त्यानंतर त्यांच्या कामाचा आलेख उंचावत गेला.

आचार्य अत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांच्या गायकीचा गौरव करताना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब त्यांना दिला होता.

लावणीसोबतच त्यांनी भावगीतं आणि भक्तीगीतं देखील गायली. त्यांनी कायम संगीताची सेवा केली. बाज कुठचाही असो पण सुलोचना चव्हाण आपल्या गायकीने त्याला वेगळी उंची प्राप्त करून दिली.

पद्मश्री पुरस्कार देत भारत सरकारने सुलोचना चव्हाण यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?