AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लग्न फार काळ टिकत नाही…’, अभिषेक – ऐश्वर्याच्या लग्नावर ‘या’ अभिनेत्रीची मोठी प्रतिक्रिया

Abhishek Bachchcan - Aishwarya Rai: ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नावर असं का म्हणाली अभिनेत्री'लग्न फार काळ टिकत नाही...', अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेकच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

'लग्न फार काळ टिकत नाही...', अभिषेक - ऐश्वर्याच्या लग्नावर 'या' अभिनेत्रीची मोठी प्रतिक्रिया
| Updated on: Oct 25, 2024 | 7:40 AM
Share

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगलेली असताना अभिनेत्याचं नाव अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत जोडलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक – निम्रत यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे निम्रत हिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, निम्रतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये निम्रत आणि अभिषेक ‘दसवी’ सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये होस्टने अभिषेक यांचं ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न केल्यामुळे अभिनंदन केलं आणि लग्नाला 15 वर्ष झाल्यामुळे दोघांचं कौतुक देखील केलं.

यावर निम्रत म्हणाली, ‘लग्न फार काळ टिकत नाही…’, अभिनेत्रीचं वक्तव्य ऐकून शोचा होस्ट आणि अभिषेक दोघे हैराण झाले. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी देखील व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिय देत आहे.

अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमात निम्रत हिने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं होतं. पण आता दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांना देखील धक्क बसला आहे. यावर दोघांनी देखील मौन बाळगलं आहे.

अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.

कोणत्याही कार्यक्रमात किंवा सोहळ्यात ऐश्वर्या मुलीसोबत पोहोचते. तर अभिषेक बच्चन कुटुंबासोबत असतो. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.