AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Mohammed Rafi | यशाच्या शिखरावर असताना ‘सुरांच्या बादशाह’ने घेतला होता क्षेत्र सोडण्याचा निर्णय, मग असे झाले की…..

रफींच्या आवाजात एक अनामिक जादू होती, जी थेट रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली. कदाचित यामुळेच आजही त्यांची गाणी लोकांच्या हृदयात आहेत.

Happy Birthday Mohammed Rafi | यशाच्या शिखरावर असताना ‘सुरांच्या बादशाह’ने घेतला होता क्षेत्र सोडण्याचा निर्णय, मग असे झाले की.....
| Updated on: Dec 24, 2020 | 10:51 AM
Share

मुंबई : आज भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी झाला होता. रफींच्या आवाजात एक अनामिक जादू होती, जी थेट रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली. कदाचित यामुळेच आजही त्यांची गाणी लोकांच्या हृदयात आहेत. असे म्हणतात की, रफींच्या आवाजाची जादू जितकी मोठी होती, तितकेच त्यांचे व्यक्तिमत्त्व देखील मोठे होते. लोकांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढे असत. म्हणूनच, लोकांच्या आणि रसिकांच्या हृदयात त्यांचे एक विशेष स्थान आहे (Mohammed Rafi Birthday Special Story).

आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचित ठावूक नसतील…

गायकी सोडण्याचा निर्णय

मोहम्मद रफी जेव्हा गायकीच्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान झाले होते, नेमक्या त्याचवेळी त्यांनी गाणे सोडण्याचे ठरवले होते. या मागचे कारण होते मौलवी. मौलवींच्या सांगण्यावरूनच त्यांनी चित्रपटात गाणे बंद केले. असे म्हटले जाते की, जेव्हा रफी साहेब हज यात्रेहून परत आले, तेव्हा काही लोकांनी त्यांना सांगितले की, आता तुम्ही हाजी झाला आहात, म्हणून तुम्ही गाणे वाजवणे हे सगळे थांबवा. त्यांच्या या सल्ल्यानंतर रफींनी गाणे सोडले.

रफींनी गायकी सोडली ही गोष्ट सर्वत्र पसरताच सर्वजण अस्वस्थ झाले. रफींच्या कुटुंबाने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी गाणे सोडले तर घर चालणार नाही, हे त्यांना परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला. बर्‍याच लोकांनी पटवून दिल्यानंतर, रफी यांची खात्री झाली आणि त्यांनी पुन्हा गाणे सुरू केले (Mohammed Rafi Birthday Special Story).

पंजाबी चित्रपटातून पहिला ब्रेक

‘गुलबलोच’ या पंजाबी चित्रपटातून रफी यांना करिअरचा पहिला ब्रेक मिळाला होता. ‘गांव की गोरी’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. 1956 ते 1965 हा काळ रफी यांच्या कारकीर्दीचा सर्वात चांगला काळ होता. या कालावधीमध्ये त्यांनी एकूण 6 फिल्मफेअर जिंकले.

सुरांच्या दुनियेचा बादशाह

लोक त्यांच्या आवाजाचे इतके वेडे होते, की मृत्यूच्या दिवशी देखील एका व्यक्तीने शेवटच्या इच्छेत त्यांचे नाव घेतले. बीबीसीच्या वृत्तानुसार, एकदा गुन्हेगाराला फाशी दिली जात होती. जेव्हा त्याला शेवटची इच्छा विचारण्यात आली, तेव्हा त्याने कुणालाही भेटण्याची इच्छा व्यक्त केली नाही किंवा काही खाल्ले नाही. त्याऐवजी, त्याने जे मागितले ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.

त्या व्यक्तीची शेवटची इच्छा होती की, रफीच्या ‘बैजू बावरा’ चित्रपटाचे गाणे ‘ऐ दुनिया के रखवाले’ मरण्यापूर्वी ऐकायचे आहे. त्यानंतर एक टेप रेकॉर्डर आणून हे गाणे वाजवले गेले. असे म्हणतात की, रफी साहेबांनी तब्बल 15 दिवस या गाण्यासाठी रियाझ केला होता. रियाझ करता करता त्यांचा आवाज रेकॉर्डिंगनंतर इतका खराब झाला होता की, कदाचित ते आपला आवाज परत मिळवू शकणार नाहीत, असेही म्हटले जात होते.

(Mohammed Rafi Birthday Special Story)

हेही वाचा : 

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.