लव्ह मॅरेज केले म्हणून नोकरीवरुन काढले, रेल्वे स्टेशनवर काढावे लागले दिवस

बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीवर अतिशय वाईट दिवस आले आहेत. लव्ह मॅरेज केले म्हणून नोकरीवरुन काढण्यात आले. त्यानंतर त्याने रेल्वे स्टेशनवर दिवस काढले. आता हा अभिनेता कोण आहे? जाणून घ्या...

लव्ह मॅरेज केले म्हणून नोकरीवरुन काढले, रेल्वे स्टेशनवर काढावे लागले दिवस
Roshan Lal
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 16, 2026 | 12:24 PM

बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहे ज्यांचे आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक अभिनेता तर असा होता ज्याने लव्ह मॅरेज केले म्हणून त्याला नोकरीवरुन काढून टाकले. त्याकाळी या अभिनेत्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. आता हा अभिनेता कोण आहे? चला जाणून घेऊया…

आज ऋतिक रोशन बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या सुपरस्टारांमध्ये गणला जातो. पण त्याच्या कुटुंबाच्या यशामागे संघर्षाची अशी कहाणी दडलेली आहे, जी फारच कमी लोकांना माहीत आहे. त्याचे आजोबा आणि दिग्गज संगीतकार रोशन (रोशनलाल नागरथ) यांनी हिंदी सिनेमाला अनेक अमर धुन दिल्या आहेत. पण एक काळ असाही होता, जेव्हा प्रेमाची किंमत त्यांना नोकरी गमावून चुकवावी लागली. परिस्थिती इतकी बिघडली की, दोन्ही पत्नींसह रेल्वे स्टेशनवर दिवस काढावे लागले. खिशात पैसे नव्हते, डोक्यावर छत नव्हते, पण त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात एक असा माणूस आला, ज्याने त्याचे आयुष्य बदलून टाकले.

स्टेशनवर बसलेले रोशन…

हा किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक किदार शर्मा यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितला होता. त्यांनी सांगितले की, एक दिवस रेल्वे स्टेशनवर त्यांची नजर एका माणसावर पडली, जो आपल्या दोन पत्नींसह सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथेच बसला होता. बोलताना कळले की, तो काही साधा माणूस नव्हता, तर ऑल इंडिया रेडिओवर संगीत देणारे रोशन होते. त्यांनी सांगितले की, लव मॅरेज केल्यामुळे त्यांची नोकरी गेली. आता कमाईचा काही मार्ग नव्हता आणि राहण्याची जागाही नव्हती.

एका माणसाने दिली खास ऑफर

चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणे रोशन यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. सुरुवातीला त्यांचे संगीत ऐकून काही लोकांनी असे म्हटले होते की हे चित्रपटांसाठी योग्य नाही. इतकेच नाही तर, काही वितरकांनी केदार शर्मा यांच्यावर दबाव आणला की त्यांनी रोशन यांना चित्रपटातून बाहेर काढावे. त्या बदल्यात त्यांना महागड्या भेटवस्तूंपासून ते मोठ्या रकमेपर्यंतची ऑफर देण्यात आली. पण केदार शर्मा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी स्पष्ट सांगितले की रोशन यांना नक्कीच संधी मिळेल. त्यांचा विश्वास अखेर खरा ठरला.

काही काळानंतर रोशन यांनी ‘बरसात की रात’, ‘दिल ही तो है’, ‘ताजमहल’ आणि ‘ममता’ यांसारख्या चित्रपटांमध्ये असे संगीत दिले की संपूर्ण देश त्यांच्या सुरांचा (चालींचा) वेडा झाला. त्यांच्याशी जोडलेला एक किस्सा असाही आहे की, आर्थिक चणचण आणि कौटुंबिक समस्यांमुळे ते इतके खचून गेले होते की त्यांनी आपले आयुष्य संपवण्याचा विचारही केला होता. पण अडचणींशी यशस्वीपणे लढत त्यांनी असे स्थान मिळवले की, आजही त्यांचे नाव हिंदी चित्रपट संगीतातील महान संगीतकारांमध्ये गणले जाते.

Follow Us