AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Story असावी तर शिवाजी साटम यांच्यासारखी; संसारात पत्नीने साथ सोडली पण ACP Pradyuman यांनी…

Love Story | अभिनेते शिवाजी साटम यांची डोळ्यात पाणी आणणारी 'लव्हस्टोरी...', पत्नीने साथ सोडल्यानंतर 'या' व्यक्तींनी दिला अभिनेते शिवाजी साटम यांना आधार... शिवाजी साटम यांच्या प्रेमाचा प्रवास थक्क करणारा

Love Story असावी तर शिवाजी साटम यांच्यासारखी; संसारात पत्नीने साथ सोडली पण ACP Pradyuman यांनी…
| Updated on: Aug 26, 2023 | 1:47 PM
Share

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : खऱ्या प्रेमाची एन्ट्री प्रत्येकाच्या आयुष्यात होते. काही जणांच्या आयुष्यात लग्नाआधी प्रेमाची एन्ट्री होते. तर काहींच्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर पत्नीवर असलेलं प्रेम बहरतं. अभिनेते शिवाजी साटम यांच्या आयुष्यात देखील असंच काही झालं. शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं अरेंज मॅरेज होतं, पण दोघांना पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की, त्यांचे अरेंज मॅरेज आहे. शिवाजी साटम यांच्या वडिलांच्या इच्छेने शिवाजी साटम आणि अरुणा साटम यांचं लग्न झालं. पण शिवाजी साटम यांच्या आयुष्यभर पत्नीची साथ मिळाली नाही. फक्त २४ वर्ष सुखी संसार केल्यानंतर अरुणा साटम यांचं निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर शिवाजी साटम पूर्णपणे खचलं होतं.

पत्नीने साथ सोडल्यानंतर शिवाजी साटम याच्या आयुष्यातील खास व्यक्तींनी त्यांना आधार दिला. खुद्द शिवाजी साटम यांनी पत्नीच्या निधनानंतर आलेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं आहे. अरुणा साटम यांचं कर्करोगाने निधन झालं. त्यांच्यावर तब्बल सात वर्ष उपचार सुरु होते. शिवाजी साटम म्हणाले, ‘कठीण परिस्थिती आल्यानंतर आपल्यामध्ये नकळत हिंमत येते. ती वेळ अत्यंत कठीण होती. मुलं मोठी होत होती.. त्यांच्यावर उत्तम संस्कार देखील करायचे होते.’

कठीण प्रसंगी साथ दिलेल्या व्यक्तींबद्दल शिवाजी साटम म्हणाले, ‘मी ‘गुलाम-ए-मुस्तफा’ सिनेमाचं शुटिंग करत होतो, तेव्हा माझ्या पत्नीचं निधन झालं. अशा परिस्थितीत अभिनेते नाना पाटेकर, अरूणा इराणी यांनी माझी साथ दिली. ते माझं कुटुंब नव्हते, पण कुटुंबापेक्षा कमी देखील नव्हते… तीन महिने त्यांनी मला सांभाळून घेतलं…’ आजही शिवाजी साटम पत्नीच्या आठवणींमध्ये जगत आहेत.

शिवाजी साटम यांचं कुटुंब

शिवाजी साटम यांचे वडील जिमनॅस्ट होते. शिवाय ते कुस्ती देखील खेळायचे. त्यांची बहीण ऍथलिट होती. तर शिवाजी साटम यांच्या पत्नी महाराष्ट्र कब्बडी टीमच्या कॅप्टन होत्या. त्यांना छत्रपती शिवाजी पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं. शिवाजी साटम यांनी देखील अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अनेक भूमिका साकारल्यानंतर ‘सीआयडी’ या मालिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर शिवाजी साटम यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आजही शिवाजी साटम यांचा ‘दया… कुछ तो गडबड हैं..’ हा डायलॉग चाहते विसरू शकलेले नाहीत. शिवाजी साटम कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.

शिवाजी साटम यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘नायक’, ‘वास्तव’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘चायना गेट’, ‘यशवंत’, ‘जिस देश में गंगा रेहता हैं’ ‘सूर्यवंशम’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. १९९८ साली शिवाजी साटम यांनी ‘सीआयडी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, शिवाजी साटम यांनी अनेक सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केलं आहे.

Follow Us
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.