AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गुंडांना काय हवंय? पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम करणाऱ्या दिलजीतबद्दल नसीरुद्दीन स्पष्टच म्हणाले..

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत चित्रपट केल्यामुळे दिलजीत दोसांझवर प्रचंड टीका होत आहे. अशातच नसीरुद्दीन शाह यांनी त्याची बाजू घेतली आहे. फेसबुकवर त्यांनी यासंदर्भात सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

या गुंडांना काय हवंय? पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम करणाऱ्या दिलजीतबद्दल नसीरुद्दीन स्पष्टच म्हणाले..
हानिया आमिर- दिलजीत दोसांझ आणि नसीरुद्दीन शाहImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2025 | 2:10 PM
Share

प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि अभिनेता दिलजीत दोसांझ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘सरदार जी 3’ या चित्रपटामुळे वादात सापडला आहे. यामागचं कारण म्हणजे, त्याच्या या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरची भूमिका आहे. या चित्रपटाचा जेव्हा टीझर प्रदर्शित झाला होता, तेव्हा हानियाचा कुठेच उल्लेख करण्यात आला नव्हता. परंतु ट्रेलरमध्ये आता तिला पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पहलगाममधील दहशवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची भूमिका अधिक तीव्र करण्यात आली होती. तरीही दिलजीतने हानियासोबत काम केल्याने, त्यावर जोरदार टीका होत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्याची बाजू घेतली आहे. फेसबुकवर एक पोस्ट लिहित त्यांनी दिलजीतवर टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.

नसीरुद्दीन शाह यांची पोस्ट-

‘मी दिलजीतसोबत खंबीरपणे उभा आहे. जुमला पार्टीचं घाणेरड्या कारस्थानाचं विभाग त्याच्यावर निशाणा साधण्याच्या संधीची वाटच पाहत होतं. अखेर ती संधी मिळाली, असं त्यांना वाटतंय. चित्रपटातील कास्टिंगसाठी तो जबाबदार नव्हता, दिग्दर्शक होता. परंतु त्यांना कोणीच ओळखत नाही आणि दिलजीतला संपूर्ण जग ओळखतं. त्याने कास्टचा स्वीकार केला कारण त्याच्या डोक्यात कोणतंही विष नाही,’ असं त्यांनी लिहिलंय. ‘या गुंडांना भारत आणि पाकिस्तानातील लोकांमधील वैयक्तिक संवाद संपवायचा आहे. माझे जवळचे नातेवाईक आणि काही प्रिय मित्र तिथे आहेत. कोणीही मला त्यांना भेटण्यापासून किंवा जेव्हा मला वाटेल तेव्हा त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ‘पाकिस्तानात जा’ असं म्हणणाऱ्यांना माझं उत्तर असेल की ‘कैलाशला जा’’, असंही त्यांनी सुनावलं आहे.

एप्रिलमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. त्यानंतरही हानिया आमिरचा चित्रपटात समावेश असल्याने भारतात दिलजीतच्या या चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी होत आहे. अनेक कलाकारांनी दिलजीतवर टीका केली. तर काहींनी त्याचं समर्थनही केलं.

दिलजीतच्या या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा ट्रेलर भारतातून युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. त्याचसोबत हा चित्रपट देशात प्रदर्शित करण्यात आला नाही. 27 जून रोजी हा चित्रपट पाकिस्तानसह इतर देशांमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये पंजाबी अभिनेत्री नीरू बाजवाचीही भूमिका आहे. चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या सहभागावर निर्मात्यांनी स्पष्ट केलं की, पहलगाम हल्ल्याच्या आधीच चित्रपटाची शूटिंग करण्यात आली होती. तर वाढता वाद पाहता नीरू बाजवाने तिच्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे सर्व पोस्टर डिलिट केले आहेत.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.