म्हणूनच मी मुंबई सोडली; सलमानसाठी गाणे लिहिण्यास नकार दिल्यानंतर नीलेश मिश्रांनी सांगितली कहाणी
टीव्ही९ भारतवर्षच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, देशभरातील आणि जगभरातील अनेक प्रमुख व्यक्ती सहभागी होत आहेत. याप्रसंगी, निलेश मिश्रा, समीर अंजान, आलोक श्रीवास्तव आणि यतींद्र मिश्रा यांसारख्या चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.

आजच्या काळात चित्रपट असोत की गाणी, सर्वत्र शिव्या आणि अश्लीलता पाहायला मिळते. चित्रपटांच्या गाण्यांधील ती कोमलता आणि सौंदर्य हळूहळू नाहीसे होत चालली आहे. जुन्या गाण्यांमध्ये या दोनही गोष्टी अगदी सहज पाहायला मिळायच्या. जुन्या गाण्यांच्या मेलोडी आणि बोल आजही अनेकांच्या आठवले असतात. पण आजच्या काळात असे काहीच दिसत नाही. आता केवळ अश्लील शब्द वापरण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे.
टीव्ही९ च्या ‘What India Thinks Today’ समिटमध्ये बोलताना प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर, गीतकार, लेखक आणि स्टोरीटेलर नीलेश मिश्रा यांनी सांगितले की, बॉलिवूडमध्ये गाणी लिहिताना अचानक असे काय घडले की त्यांना मुंबई सोडावी लागली आणि सलमान खानच्या चित्रपटातील कोणते गाणे लिहिण्यास त्यांनी नकार दिला.
‘मुंबईत गाणी लिहिणे बंद केले’
सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटामधील प्रसिद्ध गाणे ‘कॅरेक्टर ढीला’ लिहिण्याच्या प्रश्नावर नीलेश मिश्रा यांनी आश्चर्यकारक उत्तर दिले. ते म्हणाले, “हे गाणे मी लिहिलेले नाही.” नीलेश पुढे म्हणाले, “हे गाणे माझ्याकडे आले होते. ते त्या काळातील होते… कदाचित आजही असेच असेल, जेव्हा गीतकाराला आधी फक्त ‘हुक लाइन’ दिली जाते. हे एक मुख्य कारण होते की मी मुंबईत गाणी लिहिणे बंद केले. या प्रक्रियेचे इतके पतन झाले होते की मला हे करावे लागले.”
‘मला याबद्दल काहीच माहिती नव्हते’
नीलेश मिश्रा यांनी पुढे सांगितले, “माझ्याकडे ती लाइन आली. मी तिला नकार दिला. मी दुसरे गाणे लिहिले होते, तर कदाचित त्यांनी त्यातील दोन-तीन वर्सेस घेऊन हे गाणे तयार केले. क्रेडिट्सबाबत मला माहिती नव्हती की मला दिले गेले आहेत. एक गाणे माझे आणि स्वानंदचे आहे, ज्याला आम्हाला एकत्र क्रेडिट देण्यात आले. मी ते अर्ध्यातच सोडून दिले होते.” नीलेश मिश्रा यांच्या या खुलास्यामुळे बॉलिवूडमधील गीत लेखनाच्या बदलत्या पद्धती आणि गुणवत्तेच्या घसरणीचे एक नवे चित्र समोर आले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या प्रक्रियेमुळेच त्यांना मुंबई सोडावी लागली.
