AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक बच्चनला पाहण्यासाठी शेटवर प्रचंड गर्दी, घेतले 17 रिटेक, नेमकं काय घडलं?

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनला पाहण्यासाठी शूटिंगच्या सेटवर जमली होती प्रचंड गर्दी. प्रचंड लोक पाहून अभिषेक घाबरला. एका सीनसाठी घेतले 17 रिटेक. नेमकं काय घडलेलं?

अभिषेक बच्चनला पाहण्यासाठी शेटवर प्रचंड गर्दी, घेतले 17 रिटेक, नेमकं काय घडलं?
| Updated on: Jun 30, 2026 | 1:19 PM
Share

Abhishek Bachchan : 30 जून 2000 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला आता 26 वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने अभिषेकने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक संस्मरणीय किस्सा सांगितला आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा असूनही पहिल्याच शूटिंगदरम्यान तो प्रचंड घाबरला होता अशी कबुली त्याने दिली.

अभिषेकने सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचे वडील ओ. पी. दत्ता, ज्यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले होते, ते एका दिवशी शूटिंगपूर्वी संवादांचे वाचन करण्यासाठी आले होते. त्यावेळी कुलभूषण खरबंदा यांच्या तुझे नाव काय? या प्रश्नाला ‘नाव? रिफ्यूजी’ एवढेच उत्तर द्यायचे आहे असे अभिषेकला वाटले. त्यामुळे त्याने संवादांकडे फारसे लक्ष दिले नाही आणि सहकलाकार करीना कपूरसोबत गप्पा व मस्करी करण्यात वेळ घालवला.

शूटिंग गावात सुरू असताना सेटवर तब्बल पाच ते दहा हजार लोक जमले होते. अमिताभ बच्चन यांचा मुलगा पहिल्यांदाच अभिनय करत असल्याची बातमी पसरल्याने त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अभिषेकने आपला छोटासा संवाद म्हटला, पण जे. पी. दत्ता यांनी ‘कट’ म्हटले नाही. पुढे काय करावे हे न समजल्याने त्याने जवळच्या भांड्यात पाणी भरायला सुरुवात केली. तरीही शॉट ओके झाला नाही.

एकाच सीनसाठी त्याला तब्बल 16 टेक

प्रत्येक वेळी दिग्दर्शक कट म्हणताच आपण काहीतरी चूक केली आहे अशी भावना अभिषेकच्या मनात निर्माण होत होती. इतक्या मोठ्या गर्दीसमोर अभिनय करताना त्याच्यावर प्रचंड दबाव आला होता. त्यामुळे एकाच सीनसाठी त्याला तब्बल 16 टेक द्यावे लागले.

अखेरीस जे. पी. दत्ता यांनी त्याच्याशी संवाद साधला आणि नेमकी अडचण विचारली. तेव्हा अभिषेकने एवढ्या मोठ्या गर्दीसमोर अभिनय करताना भीती वाटत असल्याचे सांगितले. त्यानंतर दिग्दर्शकांनी सेटवरील सर्व प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगितले आणि अभिषेकला धीर दिला. कितीही वेळ लागला तरी मला हवा तसाच अभिनय तुझ्याकडून करून घेईन असे त्यांनी त्याला सांगितले.

याचवेळी अभिषेकला आणखी एक मोठा धक्का बसला. त्याला वाटत होते की नाव? रिफ्यूजी एवढाच त्याचा संवाद आहे. प्रत्यक्षात त्यानंतर जवळपास दोन पानांचे संवाद त्याला म्हणायचे होते. ओ. पी. दत्ता संवादांचे वाचन करत असताना आपण लक्ष न दिल्यामुळे हा गैरसमज झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

Follow Us
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार