AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी काश्मीरला जाणार…, पहलगाम हल्ल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने केलं जाहीर

Pahalgam Terror Attack: 'मी काश्मीरला जाणार...', पहलगाम हल्ल्यानंतर 'या' अभिनेत्याने केलं जाहीर, म्हणाला, 'काश्मीर आपला होता, आपला आहे आणि नेहमीच आपला राहील...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा...

मी काश्मीरला जाणार..., पहलगाम हल्ल्यानंतर 'या' अभिनेत्याने केलं जाहीर
फाईल फोटो
| Updated on: Apr 26, 2025 | 2:14 PM
Share

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात दहशदवाद्यांनी 26 पर्यटकांचा बळी घेतला. 22 एप्रिल रोजी पहलगाम याठिकाणी घडलेल्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. घटनेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं. तर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. आता अभिनेते सुनिल शेट्टी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सध्या सुनिल शेट्टी यांचं वक्तव्य तुफान चर्चेत आहे.

सुनील शेट्टी यांनी त्यांच्या विधानाद्वारे सामान्य लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांना या दहशतवाद्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. काश्मीरला भीतीची नाही तर प्रेम आणि पर्यटनाची गरज आहे… असं देखील सुनिल शेट्टी म्हणाले आहेत. मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना सुनील शेट्टी यांनी देशवासियांना त्यांच्या येणाऱ्या सुट्ट्या काश्मीरमध्ये घालवण्याचे आवाहन केले.

सुनिल शेट्टी म्हणाले, ‘एक नागरिक म्हणून आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे. आपल्याला एक गोष्ट ठरवायची आहे आणि ती म्हणजे आपली पुढील सुट्टी काश्मीरमध्येच होईल. आपल्याला दहशदवाद्यांना दाखवायचं आहे की, भारतीय घाबरलेले नाहीत.’ या घटनेनंतर, काश्मीरमधील लोक पर्यटनातील घसरणीबद्दल चिंतेत आहेत. तर सुनील शेट्टी यांनी आपला मुद्दा ठामपणे मांडला.

‘काश्मीर आपला होता, आपला आहे आणि आपलाच राहील…’

सुनिल शेट्टी यांनी स्वतः काश्मीर येथील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे. ‘जर तुम्हाला वाटत असेल की आपण तिथे पर्यटक म्हणून किंवा कलाकार म्हणून शूटिंगसाठी किंवा फिरण्यासाठी देण्यासाठी यावं, तर आम्ही तयार आहोत. या वेळी आपल्याला एकजूट राहावे लागेल. भीती आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या जाळ्यात न अडकता, आपल्याला हे दाखवून द्यावं लागेल की काश्मीर आपला होता, आपला आहे आणि नेहमीच आपला राहील.’ सध्या सुनिल शेट्टी यांचं वक्तव्य चर्चेत आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच