AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पंचायत’ फेम अभिनेत्याला 34 व्या वर्षी हार्ट अटॅक, तरुणांमधील हृदयविकाराचं प्रमाण का वाढलंय?

'पंचायत' या लोकप्रिय सीरिजमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आला. तो 34 वर्षांचा आहे. हल्ली कमी वयातील हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. यामागे कोणती कारणं असू शकतात आणि उपाय काय, ते जाणून घ्या..

'पंचायत' फेम अभिनेत्याला 34 व्या वर्षी हार्ट अटॅक, तरुणांमधील हृदयविकाराचं प्रमाण का वाढलंय?
Aasif KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2025 | 11:16 AM
Share

‘पंचायत’, ‘पाताल लोक’ आणि ‘मिर्झापूर’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या अभिनेता आसिफ खानला सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्याला हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो हळूहळू बरा होत आहे. परंतु कमी वयात येणारा हृदयविकाराचा झटका, हा अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. यामागची कारणं काय असू शकतात आणि हृदयरोग कसा टाळू शकतो, याविषयी अनेक प्रश्न विचारले जात आहेत. “वयाच्या तिशीत हार्ट अटॅक येणं ही बाब आता काही अपवादात्मक राहिली नाही. खरंतर याला जीवनशैली आणि ताण कारणीभूत आहे, ज्यामुळे तरुण वयात हृदयरोग वाढत आहे”, असं नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटच्या इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे प्रमुख संचालक डॉ. निशिथ चंद्रा म्हणाले.

यामागची कारणं काय असू शकतात?

जिममधील व्यायाम असो किंवा डेडलाइन पूर्ण करण्यासाठी वाढवलेले कामाचे तास असो.. अनेकदा तरुण वर्गाकडून त्यांच्या शरीरावर खूप ताण आणला जातो. तणाव आणि पुरेशा झोपेचा अभाव यामुळे शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. त्यातही सततच्या तणावामुळे कॉर्टिसोल आणि ॲड्रेनलाइन यांसारखे स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स यांसारख्या समस्या उद्भवतात, असं डॉक्टर चंद्रा यांनी स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by Aasif Khan (@aasifkhan_1)

“कधीकधी आपण कामात व्यस्त असताना बराच वेळ पुरेसं पाणी पित नाही. डिहायड्रेशन हेसुद्धा महत्त्वाचं कारण आहे. कारण शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास रक्त घट्ट होतं. रक्त पंप करण्यासाठी हृदयाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित झाल्याने हृदयाचं विद्युत सिग्नल अनियमित होऊ शकतं. यामुळे arrhythmias किंवा कार्डिअॅक अरेस्टसुद्धा होऊ शकतो. रक्त घट्ट झाल्यामुळे धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात”, असंही ते म्हणाले. डॉ. चंद्रा यांनी धुम्रपान हेसुद्धा हृदयविकारामागील मोठं कारण असल्याचं सांगितलं आहे.

कमी वयातील हृदयरोग टाळण्यासाठी काय करावं?

“वयाच्या तिशीत आल्यानंतर प्रत्येकाने दर वर्षी शरीराचं पूर्ण चेक-अप करायला हवं. ECG (electrocardiogram), ट्रेडमिल, इकोकार्डिओग्राम, ब्लड कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर यांची वार्षिक चाचणी केली पाहिजे. शुगरचं प्रमाण मर्यादित ठेवा, धुम्रपान सोडून द्या आणि त्याचसोबत संतुलित आहार, व्यायामावर भर द्या,” असा सल्ला डॉक्टर चंद्रा यांनी दिला आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.