AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीनंतर मोठा… सलमानच्या घराबाहेर फायरिंग करणाऱ्या आरोपींनी घरी काय सांगितलं?; इरादा काय होता?

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्वजण चांगलेच हैराण झाले. हेच नाही तर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण देखील बघायला मिळाले. आता पोलिसांनी या हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याचे देखील कळत आहे.

होळीनंतर मोठा... सलमानच्या घराबाहेर फायरिंग करणाऱ्या आरोपींनी घरी काय सांगितलं?; इरादा काय होता?
salman khan
| Updated on: Apr 16, 2024 | 1:52 PM
Share

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर सर्वजण हैराण झाले. हेच नाही तर या गोळीबाराचे काही व्हिडीओही व्हायरल होताना दिसले. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दोन हल्लेखोर दिसत होते. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घेतली. या गोळीबारानंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरूवात देखील केली.

मुंबई पोलिसांनी गुजरातच्या भुजमधून ह्ल्लेखोरांना ताब्यात देखील घेतले. हे हल्लेखोर बिहारमधील असून हे काही दिवसांपासून मुंबई येथे राहण्यासाठी आले. हेच नाही तर या हल्लेखोरांनी पनवेलमध्ये एक फ्लॅट देखील किरायाने घेतला. नवीन दुचाकीही पनवेलमध्येच खरेदी केली. गेल्या काही दिवसांपासून या गोळीबाराचे प्लॅनिंग हे सुरू असल्याचे देखील सांगितले गेले.

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे हे हल्लेखोर बिहारच्या पश्चिम चंपारणच्या मसही गावचे रहिवासी आहेत. हेच नाही तर या गोळीबाराबद्दल त्यांच्या घरच्यांना काहीच कल्पना नसल्याची देखील माहिती पुढे येतंय. मुंबईला कामासाठी जात असल्याचे सांगून हे हल्लेखोर मुंबईमध्ये आले. होळी झाल्यानंतर चार दिवसांनी हे हल्लेखोर मुंबईत दाखल झाले.

या दोन्ही हल्लेखोरांचे नाव विक्की साहब गुप्ता आणि जोगेंद्र पाल असल्याचे सांगितले जातंय. या गोळीबाराबद्दल यांचे घरचे काहीच बोलत नसून मुंबईला कामाला जात असल्याचे सांगून विक्की आणि जोगेंद्र निघाल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई गॅंगचे सदस्य असल्याचे देखील सांगितले जातंय. यांच्या घरच्यांची देखील चाैकशी केली जात असल्याचे सांगितले जातंय.

विक्की गुप्ताची आई सुनीता देवी यांनी सांगितले की, कामासाठी हे दोघे मुंबईला गेले होते. तिथे जाऊन हे काय करत होते, याबद्दल काहीही माहिती नाही. आता नुकताच विक्की साहब गुप्ता आणि जोगेंद्र पाल यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याचे कळत आहे. आता या प्रकरणात काही मोठे खुलासे होऊ शकतात. आरोपींची पोलिस कसून चाैकशी करणार असल्याचे स्पष्ट आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.