AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वक्फ कायद्याविरोधात प्रसिद्ध अभिनेत्याचा पक्ष सुप्रीम कोर्टात

वक्फ संशोधन विधेयकामुळे सध्या देशात वातावरण तापलेलं असताना प्रसिद्ध अभिनेत्याचा पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आता याप्रकरणी पक्षाने सुप्रीम कोर्टत धाव घेतली आहे...

वक्फ कायद्याविरोधात प्रसिद्ध अभिनेत्याचा पक्ष सुप्रीम कोर्टात
फाईल फोटो
| Updated on: Apr 14, 2025 | 11:17 AM
Share

वक्फ संशोधन विधेयकामुळे सध्या देशात वातावरण तापलेलं असताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि तामिळनाडूचा प्रादेशिक पक्ष तमिलगा वेट्ट्री कषगम (टीव्हीके) यांनीही वक्फ कायद्याला आव्हान दिलं आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन्ही पक्षांनी या कायद्याला अल्पसंख्याकांच्या हक्कांचे उल्लंघन आणि संविधानाच्या धर्मनिरपेक्ष भावनेविरुद्ध म्हटलं आहे. रविवारी, सीपीआयच्या वतीने पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांनी सर्वोच्च न्यायालयात लेखी याचिका दाखल केली.

याचिकेत डी राजा यांनी असा दावा केला आहे की, ही दुरुस्ती संविधानाच्या कलम 14 (समानतेचा अधिकार), कलम 25 (धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार) आणि कलम 26 (धार्मिक संस्थांना स्वातंत्र्य) यांचं उल्लंघन करते. याचिकेत असेही म्हटले आहे की, या कायद्यानुसार, वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन आता राजकीय हस्तक्षेपाच्या अधीन असू शकते, ज्यामुळे मुस्लिम समुदायाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वायत्ततेवर परिणाम होईल.

त्याच दिवशी, तमिळ सिनेमा अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या पक्ष ‘तमिलगा वेट्ट्री कषगम’ (टीव्हीके) नेही सर्वोच्च न्यायालयात त्याच कायद्याला आव्हान देणारी एक वेगळी याचिका दाखल केली. टीव्हीके याचिकेत म्हटलं आहे की, विधेयकातील दुरुस्ती राज्यांच्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण करते आणि अल्पसंख्याक समुदायांच्या हितांना हानी पोहोचवते. त्यांनी याला “राजकीयदृष्ट्या प्रेरित पाऊल” म्हटलं आहे.

या याचिकेवर आता सुप्रीम कोर्टात 16 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. वक्फ कायद्याशी संबंधित ही दुरुस्ती अनेक राज्यांमध्ये वाद आणि चिंतेचे कारण बनली आहे, त्यामुळे ही सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे.

सांगायचं झालं तर, 3 एप्रिल रोजी वक्फ संशोधन विधेयकाला मान्यता देण्यात आली. लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं, या विधेयकावर मध्यरात्री उशिरा लोकसभेत मतदान पार पडलं. अखेर हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. विधेयकाच्या बाजुनं 288 इतकी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 232 इतकी मतं पडली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं.

Follow Us
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम...
थोड्याच वेळात शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी होणार असताना वकील असीम सरोदंचं मोठं विधान, काय म्हणाले?
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंच्या FDA ला मोठा दणका, तब्बल 5 लाखांचं... कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने मोठी खळबळ
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया,
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार, चक्क... धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी; थेट...
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... पुन्हा बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य