मराठमोळ्या अभिनेत्रीचं अपहरण, 3 महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं आणि… स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुखरुप सुटका
इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना सेलिब्रिटींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं तर, अपहरण करण्यात आलं होतं, तब्बल तीन महिने अभिनेत्रीला एकाच ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेलं... तेव्हा स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी तिची सुखरुप सुटका केली.

झगमगत्या विश्वातून कायम धक्कादायक गोष्टी समोर येत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण असतं… अभिनेत्रींना तर अनेक भयानक अनुभव येत असतात. आता देखील अशीच एक घटना समोर येत आहे. मराठमोळ्या अभिनेत्रचं एका निर्णात्याने अपहरण केलं होतं. तब्बल तीन महिने अभिनेत्री एका ठिकाणी निर्मात्याने ठेवलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे, अभिनेत्रीला कुटुंबियांसोबत फोनवर बोलण्याची परवानगी होती, पण मराठी बोलायचं नाही… असं धमकावून सांगण्यात आलं होतं… तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेत्रीची सुखरुप सुटका केली.
सध्या ज्या अभिनेत्रीच्या अपहरणाची चर्चा सुरु आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सुप्रिया पाठारे आहे. सुप्रिया यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही, अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण जेव्हा त्यांचं अपहरण झालं होतं, तेव्हा कुटुंबिय प्रचंड घाबरलेले आणि स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेत्रीची सुखरुप सुटका केली.
सांगायचं झालं तर, सुप्रिया पाठारे यांनी एका मुलाखतीत 1995 साली घडलेली धक्कादायक घटना सांगितली. सुप्रिया पाठारे म्हणाल्या, एका सिनेमाच्या शुटिंगसाठी त्यांनी एका निर्णात्याने राजस्थान येथे नेलं होतं… तेव्हा त्या एकट्याच शुटिंगसाठी गेलेल्या. पण निश्चित स्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती काही वेगळीच होती. त्या निर्मत्याने सुप्रिया यांना तब्बल तीन महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं होतं…
एवढंच नाही तर, बंदुकीची भीती देखील दाखवून बळजबरी अभिनय करुन घेतला. सुप्रिया यांना फोनवर कुटुंबियांसोबत बोलण्याची परवानगी दिलेली. पण मराठीत बोलायचं नाही.. असं स्पष्ट सांगण्यात आलेलं… अशात अभिनेत्रीने गुप्त भाषेचा वापर केला आणि बहिणीला सर्वकाही सांगितलं…
पण जेव्हा सुप्रिया पाठारे निर्मात्याच्या तावडीतून सुटल्या, तेव्हा त्यांना कळलं की, या प्रकरणात बाळासाहेबांनी स्वतः लक्ष घातलं होतं. 20 तास प्रवास करुन सुप्रिया सुरक्षित सुरत येथे पोहोचल्या… यावर सुप्रिया म्हणाल्या, ‘मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन…’
सुप्रिया पाठारे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांंनी ‘पिंजरा’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘मोलकरीणबाई’, ‘होणार सून मी या घरची’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
