AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदा संपलं की संपलं..; झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेनं निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. पावणेतीन वर्ष.. 850 एपिसोड्स.. 2000 पेक्षा जास्त सीन्स.. असंख्य इमोशन्स.. अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

एकदा संपलं की संपलं..; झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेनं निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 17, 2025 | 8:34 AM
Share

छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यापैकी काही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतात. त्यातील कलाकारांना भरभरून लोकप्रियता मिळते. मात्र तरीही काही कारणास्तव मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. झी मराठी वाहिनीवरील अशीच एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. त्यानिमित्त या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. मालिकेच्या  सेटवरील अनेक आठवणीसुद्धा त्याने फोटोच्या रुपात शेअर केल्या आहेत. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आहे. ऑगस्ट 2022 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र आता हीच मालिका बंद होत आहे. या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.

रोहित परशुरामची पोस्ट-

‘पावणेतीन वर्ष.. 850 एपिसोड्स.. 2000 पेक्षा जास्त सीन्स.. असंख्य इमोशन्स (भावना).. अगणित चांगल्या आठवणी.. एक आसगाव आणि एक अर्जुन वर्षा विनायक कदम.. प्रवास थांबला. एकदा संपलं की संपलं.. ते परत नाही येत,’ अशी भावूक पोस्ट त्याने लिहिली आहे. रोहितच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आसगाव आणि अर्जुन वर्षा विनायक कदम खूप भारी समीकरण आहे. तुम्ही सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं,’ असं एकाने लिहिलं. तर ‘प्रेक्षकांचं प्रेम हेच तुमच्या कामाची पोचपावती,’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मालिकेचा प्रवास थांबला तरी प्रेक्षकांच्या मनात तुम्ही नेहमीच डॅशिंग अर्जुन म्हणून राहाल’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत शिवानी नाईक, संतोष पाटील, रोहित परशुराम, ऋषभ कोंडवार, नीलम वाडेकर, सुनिल डोंगर, सुनिल शेट्ये यांच्या भूमिका होत्या. अप्पी आणि अर्जुनच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. तर चिमुकल्या अमोलचीही भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. या मालिकेनं जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्याजागी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती