AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड सोडून राजकारणात एन्ट्री करणारा अभिनेता म्हणतो, ‘मैं घर का रहा ना घाट का..’

खरंच राजकारणात प्रवेश केल्यानंतर असं होतं? बॉलिवूड सोडल्यानंतर 'या' अभिनेत्याने धरला राजकारणाचा मार्ग, राजकारणी व्यक्तींबद्दल अभिनेता सर्वांसमोर म्हणाला...

बॉलिवूड सोडून राजकारणात एन्ट्री करणारा अभिनेता म्हणतो, 'मैं घर का रहा ना घाट का..'
| Updated on: Mar 26, 2023 | 11:04 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांवर सोडल्यानंतर काही सेलिब्रिटींनी झगमगत्या विश्वाला राम राम ठोकत राजकारणाच्या दिशेने स्वतःचा मोर्चा वळवला. बॉलिवूडमध्ये स्थान भक्कम केल्यानंतर कलाकार राजकारणात देखील उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. बॉलिवूड सोडल्यानंतर राजकारणाचा मार्ग धरणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे राज बब्बर. नुकताच राज बब्बर यांनी तीन मुलांसोबत विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. राज बब्बर यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर असून दोन मुलींचं नाव आर्या बब्बर आणि जूही बब्बर आहे. मुलांसोबत कपिलच्या शोमध्ये राज बब्बर यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

द कपिल शर्मा शोचा एक प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राज बद्दर यांना कपिल अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. कपिल, राज बब्बर यांना विचारतो, ‘तुमच्यासोबत असं कधी झालंय, निर्मात्यांनी तुमचे पैसे दिले नाहीत, पण जेव्हा तुम्ही राजकारणात प्रवेश केला, तेव्हा ते स्वतःच तुमचे पैसे घवून आले…’

कपिलने असा प्रश्न विचारल्यानंतर राज बब्बर म्हणाले, ‘मी जेव्हा सामाजिक कार्यात सहभाग घेतला, तेव्हा ज्यांनी मला पैसे द्यायला हवे होते, त्यांनी देखील मला पैसे देणं बंद केलं. त्यांना असं वाटलं राज यांना आता पैशांची काय गरज आहे.’ असं राज बब्बर म्हणाले.

राजकारणी व्यक्तींबद्दल राज बब्बर म्हणाले, ‘राजकारणाची प्रतिमा फार वाईट आहे. राजकारणात प्रवेश केला म्हणजे तुमच्याकडे १०० – ५०० कोटी रुपयाची संपत्ती आहे… असा समज होतो. माझं काय झालं आहे? ‘मैं घर का रहा ना घाट का..’ अशा विनोदी अंदाजात राज बब्बर यांनी राजकारणाबद्दल आपली भूमिका मांडली.

राजकारणाला राम राम ठोकल्यानंतर राज बब्बर यांनी राजकारणाचा मार्ग धरला. आता राज बद्दल काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. राज बब्बर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम काम केलं. ‘आप जैसा कोई नहीं’, ‘इन्सानियत के दुष्मन’, ‘इन्साफ का तराजू’, ‘उमराव जान’, ‘औलाद के दुष्मन’, ‘काल्का’, ‘जीने नहीं दूंगा’, ‘दौलत’, ‘निकाह’, ‘बॉडीगार्ड’, ‘माटी मांगे खून’, ‘सौ दिन सास के’ सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत झळकले.

राज बब्बर यांच्या शिवाय बॉलिवूड सोडून अभिनेते परेश रावल, जया बच्चन, रेखा, उर्मिला मातोंडकर यांसारख्या अनेक कलाकारांनी राजकारणाचा मार्ग धरला. एका काळ असा होता जेव्हा या सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

Follow Us
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.