AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रितेशचा राजा शिवाजी चित्रपट नेमका कसा, 9 शब्दात लावला निकाल; दिग्गज दिग्दर्शकाच्या एका प्रतिक्रियेमुळ तुफान उठलं!

गेल्या काही दिवसांपासून राजा शिवाजी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता या चित्रपटाविषयी दिग्गज दिग्दर्शकाने पोस्ट केली आहे.

रितेशचा राजा शिवाजी चित्रपट नेमका कसा, 9 शब्दात लावला निकाल; दिग्गज दिग्दर्शकाच्या एका प्रतिक्रियेमुळ तुफान उठलं!
राजा शिवाजीImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 02, 2026 | 3:11 PM
Share

रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दणदणीत सुरुवात केली आहे. रितेश देशमुखने स्वतः लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केलेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा देखील ‘राजा शिवाजी’चे फॅन झाले आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, रितेश चित्रपटगृहात कमाल करत असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील रितेशच्या अभिनयाचे कौतुक करताना म्हटले की, “रितेश खरोखरच शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म वाटत आहे.”

राम गोपाल वर्मा यांनी केलं कौतुक

राम गोपाल वर्मा यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) लिहिले, “जिनिलिया, तुझा चित्रपट ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन! रितेश दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दोन्ही रूपांत थिएटरमध्ये खळबळ माजवत आहे. तो खरोखरच शिवाजी महाराजांच्या पुनर्जन्मासारखा दिसत आहे.”

‘राजा शिवाजी’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या प्राथमिक अहवालानुसार, ‘राजा शिवाजी’ने भारतात पहिल्या दिवशी ६,१९२ शोमधून ११.३५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने मराठी आवृत्तीत ८.०० कोटी, तर हिंदी आवृत्तीत ३.३५ कोटी रुपयांची कमाई केली. महाराष्ट्रात सांगलीमध्ये सर्वाधिक ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली, त्यापाठोपाठ पुणे, मुंबई आणि नाशिकचा क्रमांक लागतो.

चित्रपटाबद्दल काही खास गोष्टी

‘राजा शिवाजी’ सिनेमामध्ये रितेश देशमुखने मुख्य भूमिका साकारली असून, यात अभिषेक बच्चन, जिनिलिया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. हा ऐतिहासिक चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरुवातीच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....