AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मधून या अभिनेत्याला काढून टाकण्यात आलं? तो म्हणाला, ‘कोणीही स्वत:हून….’

'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून एका अभिनेत्याला काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे. या अभिनेत्याने एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला आहे. तसेच त्याला काढून टाकलं असल्याचंही त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट झाल्याचं म्हटलं जात आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून या अभिनेत्याला काढून टाकण्यात आलं? तो म्हणाला, 'कोणीही स्वत:हून....'
Rajeev Thakur exited The Kapil Sharma Show, was he really fired from the showImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 31, 2025 | 4:12 PM
Share

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चे नवनवीन भाग येत आहेत तेही अगदी नवीन थीमसह. पण आता पुढच्यावेळी या शोमध्ये एक अभिनेता कमी दिसणार आहे या शोमधून या अभिनेत्याला काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसंच याबद्दल त्या अभिनेत्यानं देखील स्वत: खुलासा केला आहे.

शोमधून बाहेर निघण्याचं कारण सांगितलं

हा अभिनेता म्हणजे राजीव ठाकूर. कपिल शर्माच्या शोच्या नवीन सीझनमध्ये आता राजीव दिसणार नाहीये. लोकांना वाटत आहे की त्याने ब्रेक घेतला आहे पण आता त्याने यावेळी शोमध्ये का नाही याचं कारण सांगितले आहे. एका मुलाखतीदरम्यान राजीवने कारण सांगितलं आहे. राजीव म्हणाला की “शोची वेळ कमी होती. त्यांच्याकडे माझ्यासाठी फारशी संधी देखील नव्हती. तारखा देखील जुळत नव्हत्या. यामुळे मला शो सोडावा लागला.” तथापि, संभाषणादरम्यान त्याने असेही सांगितले की त्याने स्वतःच्या इच्छेने हा शो सोडला नाही तर त्यांना काढून टाकण्यात आलं आहे.

शोमध्ये नसण्याचे कारण

राजीवला जेव्हा मुलाखतीत जेव्हा विचारण्यात आलं की, त्याने ब्रेक का घेतला? यावर राजीव गमतीने म्हणाला, ‘एवढ्या मोठ्या शोमधून कोणीही ब्रेक घेत नाही, अर्थातच मला काढून टाकले असेल.’ तो पुढे म्हणाला, ‘तारखा जुळत नव्हत्या आणि ते मला मध्येच बोलावत होते. माझ्याकडे काही पूर्वीच्या कमिटमेंट्स होत्या ज्या मी मोडू इच्छित नव्हतो. त्यांना सुमारे 55 मिनिटांचा एक अतिशय छोटा शो द्यावा लागला. यामध्ये कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोव्हर, कपिल, सर्वांना त्यांचे स्किट्स सादर करायचे होते. या सर्वांव्यतिरिक्त, पाहुणे देखील होते.55 मिनिटांत खूप काही करायचे होते, त्यामुळे शोमध्ये माझ्यासाठी खूप कमी जागा होती. अशा परिस्थितीत, माझ्यासाठी न्याय करणे शक्य नव्हते.’

मस्करी करणे भारी पडलं

राजीवला विचारण्यात आले की एखाद्या विनोदी कलाकाराने स्वत:वर खिल्ली उडवणे कितपत योग्य असते? ते महत्त्वाचे असते का? यावर राजीवने कॉमेडी सर्कसमधील त्याचे दिवस आठवले. त्याने सांगितले की एका चुकीमुळे लोकांना त्याचा अभिनय कंटाळवाणा वाटू लागला. राजीव म्हणाला ‘या विचारसरणीचा माझ्या कारकिर्दीवर इतका परिणाम झाला की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. कॉमेडी सर्कसमध्ये विनोदी कलाकारांचे जोडीदार होते आणि ते एकमेकांवर विनोद करायचे होते. सलोनी माझ्यासोबत होती आणि मी हे करू शकत नव्हतो. मी तिला माझ्यावर विनोद करायला दिले आणि तिच्यासोबत ते केले नाही. मी तिला माझे संवादही दिले ज्यामुळे लोकांची अशी खिल्ली उडवता येईल’

एका डॉयलॉगमुळे लोक त्याला कंटाळवाणा म्हणायचे

राजीवने पुढे सांगितले, ‘ माझा असा एक डायलॉग होता की, मी एका लहान मुलाचे पैसे उडवत आहे. लोक हा संवाद वेगळ्या पद्धतीने घेऊ लागले आणि मला वाटले की मी एक कलाकार आहे म्हणून मी स्वतःवर विनोद ऐकले पाहिजेत. हळूहळू लोक मला सांगू लागले की मी त्यांना बोअर करतोय.’ पण हे बरोबर नव्हते. एक कंटाळवाणा माणूस 8 वर्षे एका कॉमेडी शोचे 14 सीझन करू शकतो का?’

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.