AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू या मॅटरमध्ये पडू नको, बिश्नोईच्या धमकीनंतर राखी सावंत घाबरली.. काय निर्णय घेतला?

राखी सावंतला आलेल्या ईमेलमध्ये लिहिलंय.. राखी, तुझं आणि आमचा काही वाद नाही. तू सलमान खान प्रकरणात इनवॉल्व होऊ नको...

तू या मॅटरमध्ये पडू नको, बिश्नोईच्या धमकीनंतर राखी सावंत घाबरली.. काय निर्णय घेतला?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 20, 2023 | 11:16 AM
Share

गोविंद ठाकूर, मुंबई : अभिनेता सलमान खानला (Salman Khan) मिळालेल्या धमकीनंतर आता राखी सावंतलाही (Rakhi Sawant) धमकीचे ईमेल आलेत. सलमान खान आणि राखी सावंत यांच्यातील नातं जगजाहीर आहे. भाऊ म्हणून सलमान खानने राखी सावंतला अनेकवेळा मदत केली आहे. मात्र राखी सावंतने सलमान खानपासून दूर रहावं, त्याला मिळालेल्या धमक्यांविषयी बोलू नये, असा इशारा देण्यात आलाय. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावानेच राखी सावंतला असे ईमेल आलेत. तू या मॅटरमध्ये पडू नकोस, असं सांगण्यात आलंय. या धमकीमुळे राखी सावंत प्रचंड घाबरली आहे. राखी सावंत आता तिचा लूक कसा बदलायचा याबाबत तिच्या जवळच्या नातेवाईकांकडून सल्ला घेत आहे.

राखी सावंतला काय ईमेल?

राखीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय, मला धमकीचे ईमेल आलेत. लॉरेन्स बिश्नोई गँगचे ते सदस्य असल्याचं म्हटलंय. तू सलमान खानविषयी काही बोललीस तर तुलाही मारू, असा इशारा ईमेलमधून देण्यात आलाय.

पण सलमान खानविषयी मी बोलत राहणार. माझी आई आजारी असताना, त्याने खूप मोठी मदत केली होती. आई कँसरशी झुंज देत असताना सलमान खानने ५० लाख रुपये खर्च केला जोता. मी का त्याच्याविषय़ी बोलू नको? लॉरेन्स बिश्नोई गँगने सिद्धू मूसेवाला यालाही मारलं. माणूस जिवंत असेल तर आपण त्याची बाजू घेऊ नये का, असा सवाल राखी सावंतने केला.

मी गोंधळलेय, घाबरले…

मुलाखतीत राखी सावंत म्हणाली की, मी याविरोधात कायदेशीर कारवाई करत नाहीये. पण मी खूप घाबरले आणि गोंधळले आहे. या प्रकरणाचं काय करयाचं, हे माहिती नाही. मी हे सगळं देवावर सोडते.

राखी सावंतला आलेले ईमेल हे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराडशी संबंधित सदस्यांनी पाठवल्याचा दावा करण्यात आलाय. राखी सावंतला पहिला ईमेल १८ एप्रिल रोजी सकाळी ७.२२ वाजता आला होता. तर दुसरा ईमेल त्याच दिवशी दुपारी १ वाजून १९ मिनिटांनी आला होता.

या ईमेलमध्ये लिहिलंय, राखी, तुझं आणि आमचा काही वाद नाही. तू सलमान खान प्रकरणात इनवॉल्व होऊ नको. नाहीतर तुला प्रॉब्लेम होईल. तुझा भाऊ सलमानला आम्ही मुंबईतच मारू. त्यानं कितीही सुरक्षा वाढवू देत. आता तर त्याला सुरक्षा व्यवस्थेतच मारणार. राखी, तुझ्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे. नाही तर तू तयार रहा..

तर दुसऱ्या ईमध्ये लिहिलंय… राखी तुला शेवटचं सांगतोय. सलमान खानला कुणीही वाचवू शकत नाही. आम्हाला कुणाची भीती नाही. सलमान खानचा अहंकार तोडायचा आहे. पैसा आणि पॉवरचा खूप गर्व आहे त्याला. त्याने गोल्डी भाईशी बोलावं नाही तर तयारी ठेवावी.. लवकरच त्याला त्याच्या घराबाहेर मारू..

सलमान खानलादेखील अनेक वेळा धमक्या आल्या आहेत. १० एप्रिल रोजी एक धमकी पुन्हा आली. फोनवरून कॉलरने त्याचं नाव जोधपूरहून गौरक्षक रॉकी भाई असं सांगितलं होतं. ३० एप्रिल रोजी सलमान खानला खतम करणार, असं संबंधिताने फोनवर सांगितलं होतं…

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.