AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणदीप हुडाचं 30 किलो वजन झालं कमी, डॉक्टर बहिणीचा कमाल, Weight Loss साठी सांगितला उत्तम पर्याय

Randeep Hoodas Sisters | रणदीप हुडा याच्या डॉक्टर बहिणीने सांगितला वजन कमी करण्याचा उत्तम पर्याय, अभिनेत्याचं 30 किलो वजन कसं कमी झालं? जाणून घ्या... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणदीप याच्या डॉक्टर बहिणीची चर्चा...

रणदीप हुडाचं 30 किलो वजन झालं कमी, डॉक्टर बहिणीचा कमाल, Weight Loss साठी सांगितला उत्तम पर्याय
| Updated on: Apr 01, 2024 | 10:58 AM
Share

अभिनेता रणदीप हुडा सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie ) सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमात अभिनेत्याने वीर सावरकर यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. वीर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने स्वतःचं 30 किलो वजन कमी केलं. 30 किलो वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने प्रचंड मेहनत घेतली आहे. ज्यासाठी अभिनेत्याच्या डॉक्टर बहिणीने त्याची मदत केली. रणदीप याच्या डॉक्टर बहिणीचं नाव अंजली हुडा सांगवान आहे. अंजली MD डॉक्टर आहेत. त्या लोकांना त्यांचं वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

अंजली हुडा सांगवान म्हणाल्या, ‘रणदीप याला सरबजीत सिनेमात वजन कमी करण्यासाठी पद्धत सांगितली होती आणि वीर सावरकर सिनेमात त्याला ती पद्धत फायदेशीर ठरली.‘ अंजली हुडा सांगवान सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्या इतरांना वजन कमी करण्यासाठी टिप्स देखील देत असतात.

सोशल मीडियावर अंजली हुडा सांगवान एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणाल्या होत्या, ‘जर कोणी फार लवकर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर, अशा व्यक्तींना किडनी स्टोन, गॉल ब्लॅडर यांसारखे आजार होत असतात… डिहायड्रेशनमुळे देखील अनेक समस्या डोकं वर काढतात.’

क्रॅश डायटिंगपासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. रणदीप याने वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेतली. एक्सपर्ट लोकांच्या मदतीने आणि योग्य आहार घेऊन त्याने स्वतःचं वजन कमी केलं आहे. वर्कआऊट, आहार सर्व गोष्टी लक्षात घेत अभिनेत्याचं वजन कमी करण्यासाठी अनेकांनी मदत केली आहे.

‘वजन कमी करण्यासाठी जेवण न करणं ही सर्वात मोठी चूक आहे. तर योग्य आहाराची गरज शरीराला असतेच.’ असं देखील अभिनेत्याच्या बहिणीने सांगितलं आहे. सिनेमासाठी वजन कमी केल्यानंतर अभिनेत्याने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला होता.

सिनेमामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये तुफान वाढ झाली. सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंड देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.