AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरपुडा मोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी अक्षय कुमार – रवीना टंडन दिसले एकत्र; नेटकरी म्हणाले ‘असंभव’!

अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहरा' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्या काळात या दोघांची जोडी सर्वाधिक चर्चेत होती.

साखरपुडा मोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी अक्षय कुमार - रवीना टंडन दिसले एकत्र; नेटकरी म्हणाले 'असंभव'!
Akshay Kumar and Raveena TandonImage Credit source: Instagram
| Updated on: May 08, 2023 | 1:36 PM
Share

मुंबई : 90 च्या दशकात अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. वर्तमानपत्र आणि फिल्म मॅगझिनमध्ये या दोघांच्या अफेअरचे किस्से रंगायचे. आता बऱ्याच वर्षांनंतर ही प्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली आहे. अक्षय आणि रवीनाला नुकत्याच एका कार्यक्रमात एकमेकांशी गप्पा मारताना पाहिलं गेलं आहे. मुंबई रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अक्षय आणि रवीनासुद्धा पोहोचले होते. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये अक्षय आणि रवीना एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. बऱ्याच वर्षांनंतर या लोकप्रिय जोडीला एकत्र पाहून चाहत्यांनीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं स्टेजवर एकत्र दिसत आहेत. रवीना ही अक्षयचं कौतुक करताना म्हणतेय, “90 च्या दशकातील एक रॉकस्टार जो आजसुद्धा रॉकस्टार आहे आणि नेहमीच रॉकस्टार राहणार.” याशिवाय रवीना आणि अक्षयचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये दोघं बाजूबाजूला बसलेले आहेत आणि गप्पा मारत आहेत.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हे काय पाहतोय, असंभव’ असं एकाने लिहिलं. तर ‘जुन्या दिवसांची पुन्हा आठवण आली’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘प्रॅक्टिकली याला म्हणतात की मूव्ह ऑन होणं’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्या काळात या दोघांची जोडी सर्वाधिक चर्चेत होती. त्यांच्या अफेअरचे किस्से आजही चवीने चघळले जातात. 90 च्या दशकात या दोघांचा साखरपुडाही झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडलं. नंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. तर रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.