AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री सलमान-शाहरुख अचानक पोहोचले आमिर खानच्या घरी; नेमकं काय आहे कारण?

बॉलिवूड इंडस्ट्रीत तीन खान एकत्र येण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान या तिघांना फार क्वचित एकत्र पाहिलं जातं. नुकतंच सलमान आणि शाहरुखला आमिरच्या घरी पाहिलं गेलं.

मध्यरात्री सलमान-शाहरुख अचानक पोहोचले आमिर खानच्या घरी; नेमकं काय आहे कारण?
सलमान खान, आमिर खानImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 13, 2025 | 12:00 PM
Share

आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान या बॉलिवूड इंडस्ट्रीतील तीन मोठ्या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतूर असतात. मात्र चाहत्यांची ही इच्छा फार क्वचित पूर्ण होताना दिसते. आमिर, शाहरुख आणि सलमान सहसा एकत्र येत नाहीत, पण जेव्हा ते येतात.. तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते. असंच काहीसं बुधवारी रात्री पहायला मिळालं. बुधवारी रात्री तिन्ही खान एकत्र दिसले. शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांना आमिरच्या घराबाहेर पाहिलं गेलं. मात्र हे तिघे अचानक असे एकत्र का आले, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सलमान आणि शाहरुख असं मध्यरात्री आमिरच्या घरी का गेले, असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

यामागचं कारण म्हणजे आमिर येत्या 14 मार्च रोजी त्याचा 60 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सलमान आणि शाहरुख त्याच्या घरी पोहोचले होते. या दोघांनी आमिरच्या घरी त्याचा वाढदिवस साजरा केला. कडक सुरक्षेत सलमान आमिरच्या घरी पोहोचला होता. तर शाहरुखने पापाराझींपासून चेहरा लपवत तिथून हळूच काढता पाय घेतला. बर्थडे सेलिब्रेशननंतर आमिर सलमानला गाडीपर्यंत सोडायला बाहेर आला होता. तेव्हा पापाराझींनी त्यांचा व्हिडीओ शूट केला.

तिन्ही खानच्या भेटीचं आणखी एक कारण म्हणजे इफ्तार पार्टी असल्याचंही म्हटलं जातंय. आमिरने त्याच्या घरी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी शाहरुख आणि सलमान वेळात वेळ काढून तिथे पोहोचल्याचं समजतंय. दरवर्षी राजकीय नेते बाबा सिद्दिकी मोठ्या इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. त्यावेळी सलमान आणि शाहरुख तिथे आवर्जून हजेरी लावतात. याशिवाय बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीसुद्धा या इफ्तार पार्टीला उपस्थित राहायचे. मात्र गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी आणि सलमान खान यांच्यात फार जुनी मैत्री होती.

आमिरच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने काही काळ कामातून ब्रेक घेतला आहे. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता यावा यासाठी आमिरने हा ब्रेक घेतला आहे. यादरम्यान त्याचा मुलगा जुनैद खानचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यापैकी ‘महाराजा’मधील त्याच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. मात्र खुशी कपूरसोबतचा त्याचा ‘लवयापा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....