AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“दोन्ही पूर्व पत्नी शिव्या देतील..”; आमिर खानच्या मुलाने सलमानसमोर असं का म्हटलं?

अभिनेता आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान हे दोघं 'बिग बॉस 18'च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. यावेळी जुनैदने आमिरबद्दल सलमानला असं काही सांगितलं, जे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दोन्ही पूर्व पत्नी शिव्या देतील..; आमिर खानच्या मुलाने सलमानसमोर असं का म्हटलं?
Junaid Khan with Salman and Aamir KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 21, 2025 | 1:29 PM
Share

तब्बल 105 दिवसांनंतर रविवारी ‘बिग बॉस 18’ची सांगता झाली. सलमान खानने ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन केलं. तर या एपिसोडमध्ये खास पाहुणे म्हणून अभिनेता आमिर खान, त्याचा मुलगा जुनैद खान आणि अभिनेत्री खुशी कपूर पोहोचले होते. ‘बिग बॉस 18’ ग्रँड फिनालेच्या मंचावर आमिर आणि सलमानने खूप धमाल केली. या दोघांच्या मैत्रीची परीक्षा घेण्यासाठी आमिरच्या मुलाने एक मजेशीर खेळ आयोजित केला. आमिर आणि सलमान यांना एकमेकांचे मोबाइल फोन बदलून एकमेकांच्या फोनमधील मेसेज तपासायला सांगितले. यानंतर जी गंमत झाली, ती पाहण्यासारखी होती.

सुरुवातीला सलमानने त्याचा फोन आमिरच्या हातात देण्यास नकार दिला. “मला हा खेळ खेळायचा नाही”, असं तो म्हणाला. त्यावर आमिरने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सलमान मस्करीत त्याला म्हणतो, “सोड.. तुझं सगळं व्यवस्थित आहे. तू दोन वेळा लग्न केलंस, तुला मुलंबाळं आहेत. माझ्या आयुष्यात यापैकी काहीच नाहीये.” या गमतीशीर संवादानंतर अखेर सलमान त्याचा फोन आमिरच्या हातात देतो आणि त्याचा फोन स्वत:च्या हातात घेतो. आमिरचा फोन तपासताना सलमान त्याला म्हणतो, “तुझी कोणी नवीन गर्लफ्रेंड आहे का?” त्यावर आमिर सांगतो की, “माझा फोन बघ, मग तुला उत्तर मिळेल.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आमिर आणि सलमान एकमेकांचा फोन बघून मस्करी करत असतानाच जुनैदच्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकतो. आमिरचा फोन हातात घेऊन सलमान म्हणतो, “मला तुझ्या फोनमध्ये काय दिसणार आहे? एकतर रिना किंवा किरणच तुला मेसेज करतील.” हे ऐकून आमिरचा मुलगा जुनैद म्हणतो, “मग दोन-दोन पूर्व पत्नींच्या शिव्या तुम्हाला वाचायला मिळतील.” यावर सर्वजण हसू लागतात.

आमिर खानने 1986 मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. मात्र 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. जुनैद आणि आयरा ही रिना-आमिरची मुलं आहेत. त्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण रावशी लग्न केलं. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. आमिर आणि किरण यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेतला.

Follow Us
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, नेमकं.
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं
महिला आरक्षणावरून राजकारण तापलं; खोटं कितीही बोललं तरी सत्य कायम राहतं.
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल.
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?.
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान.
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची.