AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाली असतानाही सलमान खानने घेतला मोठा निर्णय

Salman Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्यानंतर ही तो बाहेर पडत होता. पण बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तो आणखी सतर्क झाला आहे. सलमान खानचं कुटुंब यामुळे चिंतेत आहे. पण असं असताना ही सलमान खानने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाली असतानाही सलमान खानने घेतला मोठा निर्णय
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 17, 2024 | 5:11 PM
Share

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली होती. 12 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला होता. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते. त्यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. कोणी सलमान खानशी संबंध ठेवेल तर त्यालाही असेच भोगावे लागेल अशी धमकी ही देण्यात आली होती. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, या सगळ्यामध्ये अभिनेता सलमान खानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सलमान खान सध्या बिग बॉस 18 हा रिॲलिटी शो होस्ट करण्यात तसेच एआर मुरुगदास दिग्दर्शित सिकंदर या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रविवारी बाब सिद्दिकी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्याने सर्व शूट रद्द केले होते, त्यानंतर ही तो शूटिंग करणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण त्याला धमकी मिळाली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शूटिंग रद्द केल्याची बातमी खरी नसल्याचे म्हटले आहे. अभिनेत्याची सुरक्षा सेटवर कडक करण्यात आली आहे. सलमान खान याच्या आसपास नेहमीच सुरक्षा होती, परंतु आता आणखी 8 ते 10 सुरक्षा रक्षक जोडले गेले आहेत. सलमान खान येण्याआधी ते आधी रेकीसाठी येतात.

सलमान खानने शुटिंग शेड्यूल 1-2 दिवसांनी पुढे ढकलले होते. परंतु त्याचा काही खास परिणाम होणार नाही. शूटिंग नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये संपेल असे अपेक्षित होते. आता ते जानेवारीपर्यंत जाईल. कारण सध्या सर्वांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. मुरुगादास यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे शूटिंग पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मुंबईतील एसआरपीएफ मैदानावर पुढील शुटिंग होणार आहे. सलमान खानच्या सुरक्षेचा विचार करून शूटिंगचे लोकेशन गुप्त ठेवण्यात येणार आहे. प्रोडक्शन टीमलाच याबाबत माहिती दिली जाणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “आधी हैदराबादमध्ये हे शूट होणार होते. पण आता मुंबईत सर्व शुट होणार असल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.