AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याच्या मृत्यूने सर्वकाही बदललं, निरागसता हरपली..; सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलताना शहनाजला भावना अनावर

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या चार वर्षांनंतर अभिनेत्री शहनाज गिल त्याच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. सिद्धार्थनंतर आयुष्य कसं बदललं, याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. मी आधीसारखी नाही राहिले, असं शहनाज म्हणाली.

त्याच्या मृत्यूने सर्वकाही बदललं, निरागसता हरपली..; सिद्धार्थ शुक्लाबद्दल बोलताना शहनाजला भावना अनावर
Shehnaaz Gill and Siddharth ShuklaImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2025 | 9:20 AM
Share

‘बिग बॉस 13’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या ‘इक कुडी’ या पंजाबी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत शहनाज तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सिद्धार्थ गेल्यानंतर मी पूर्णपणे बदलली, आता मी पहिली शहनाज नाही राहिले, असं ती म्हणाली. 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं होतं. त्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर आले होते, ज्यामध्ये शहनाज ढसाढसा रडताना दिसून आली होतती. आता नुकत्याच दिलेल्या या मुलाखतीत शहनाजने सिद्धार्थच्या निधनाचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, याविषयी सांगितलं.

शहनाजने रणवीर अलाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तिने सांगितलं की, सिद्धार्थच्या अचानक जाण्याने तिला पूर्णपणे बदललंय. मी माझी निरागसता गमावली आहे, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. शहनाज आणि सिद्धार्थ हे ‘बिग बॉस 13’मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. सुरुवातीला या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. परंतु हळूहळू त्याचं मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर झालं होतं. या दोघांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडायची. चाहत्यांनी त्यांना ‘सिदनाज’ असं टोपणनाव दिलं होतं.

“सिद्धार्थ मला खूप परिपक्व बनवून गेला. हे सर्व घडल्यानंतर मी आणखी परिपक्व झाले आहे. नाहीतर मी अजूनही तीच बिग बॉस गर्ल असते, जिला कोणाचीही पर्वा नव्हती, काहीही नाही. बिग बॉस 13 मध्ये लोकांनी ज्या शहनाजला पाहिलं होतं, तिने आयुष्यात खूप संघर्ष केला होता. परंतु सिद्धार्तच्या मृत्यूनंतर तिने जे गमावलं, त्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. मी आधी खूप निश्चिंत, आनंदी, मनमौजी होते. पण तो गेल्यानंतर माझी निरागसताच हरवली आहे”, असं शहनाज म्हणाली.

शहनाजने पुढे सांगितलं की ती अनेकदा बिग बॉसच्या प्रवासातील व्हिडीओ, इन्स्टाग्राम रील्स पाहते. ते पाहून मी किती पुढे आले आणि किती बदलले, याचं मला खूप आश्चर्य वाटतं, असं ती म्हणाली. “कधीकधी मी त्या रील्सकडे पाहते आणि विचार करते की, मी कशी होते? मी खरंच अशी होती का? आयुष्याने मला खूप बदललंय. ती मुलगी वेगळी होती. सहज आणि आनंदी होती. मला माझ्या भावनांनीही खूप बदललंय. मला बिग बॉसनंतर चंदीगडला परत जायचं होतं. पण सिद्धार्थने मला मुंबईत थांबवलं होतं. त्याने इथे माझी सर्व व्यवस्था केली होती. त्यावेळी मला मुंबईबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी स्वत:वर काम केलं, स्वत:ला सुधारलं आणि माझं करिअर पुन्हा सुरुवातीपासून घडवलं. याचं सर्व श्रेय सिद्धार्थलाच जातं”, अशा शब्दांत शहनाज व्यक्त झाली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...