AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

आता राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचे धोरण आखले आहे. | vaishali mhade NCP

गायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
| Updated on: Mar 29, 2021 | 12:47 PM
Share

मुंबई: सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे (vaishali mhade)या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 31 मार्चला मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.(singer vaishali mhade will join NCP on 31st March)

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचे धोरण आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वैशाली माडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येणार आहे. वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. ‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्याने वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. त्यानंतर बिग बॉस या कार्य़क्रमामुळेही वैशाली माडे प्रचंड चर्चेत होत्या. त्यांच्या या लोकप्रियतेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षविस्तारासाठी फायदा होऊ शकतो.

‘मराठी सारेगमपा’मुळे प्रकाशझोतात

वैशाली माडे हे आजच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या पार्श्वगायकांपैकी एक नाव आहे. आतापर्यंत वैशाली माडे यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत. 2008 मध्ये वैशाली माडे ‘झी मराठी’च्या मराठी ‘सा रे ग म प’च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या होत्या. त्यानंतर वैशाली माडे यांनी 2009 मध्ये ‘झी’च्या हिंदी ‘सा रे ग म प’च्या किताबावरही आपले नाव कोरले होते.

(singer vaishali mhade will join NCP on 31st March)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.