AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sirf Ek Banda Kafi Hai | सिनेमाची कथा आसाराम बापू यांच्यावर आधारित आहे? लेखकाकडून सत्य समोर

अभिनेता मनोज बाजपेयी स्टारर 'सिर्फ एक बंदा काफी हैं' आसाराम बापू यांच्यावर आधारित आहे? वादग्रस्त परिस्थितीनंतर सिनेमाच्या लेखकाने सांगितलं सत्य

Sirf Ek Banda Kafi Hai | सिनेमाची कथा आसाराम बापू  यांच्यावर आधारित आहे? लेखकाकडून सत्य समोर
| Updated on: Jun 06, 2023 | 12:13 PM
Share

मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी स्टारर ‘सिर्फ एक बंदा काफी हैं’ (Sirf Ek Bandaa Kafi Hai) सीनेमाची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रतिसाद दिला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये देखील सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे सिनेमाच्या कथेमुळे वादग्रस्त परिस्थिती तयार झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमा आसाराम बापू यांच्यावर आधारित असल्याची चर्चा रंगत असताना आसाराम बापू ट्रस्टकडून सिनेमाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान सिनेमाचे लेखक दिपक किंगरानी यांनी सिनेमाच्या कथेबद्दल सांगितलं आहे. दिपक किंगरानी म्हणाले, ‘सिनेमाची कथा आसाराम बापू यांच्यावर आधारित नसून वकील आणि जोधपूर पोलीस यांच्या उत्तम कामगिरी भोवती सिनेमाची कथा फिरत आहे. त्यांच्या कामाला लक्षात ठेवून सिनेमाची कथा तयार करण्यात आली आहे…’

दिपक किंगरानी पुढे म्हणाले, ‘प्रेक्षकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवण्याची सिनेमाना साकारण्यात आला आहे. सिनेमाच्या माध्यमातून कोणाची प्रतिभा मलिन करण्याचा आणि कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. सिनेमाची कथा एका वकिलाच्या जिद्दी भोवती फिरत आहे. ज्यामध्ये बाबाला जामीन न मिळू देण्यासाठी वकील पूर्ण प्रयत्न करत आहे…’

पुढे दिपक किंगरानी यांना सिनेमातील राजकीय हस्तक्षेपाबद्दल देखील विचारण्यात आलं. यावर सिनेमाचे लेखक म्हणाले, ‘सिनेमात कोणत्याही प्रकारची राजकीय बाजू दाखवण्यात आलेली नाही. सिनेमात राजकीय हस्तक्षेप आम्हाला नको होता. ज्या लोकांनी चांगलं काम केलं आहे, त्यांच्या कामाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू होता..

‘एका अल्पवयीन मुलगी बाबा विरोधात तक्रार दाखल करते. पोलिसांनी मुलीची तक्रार नोंदवली आणि वकिलांनी तिला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले… असं सिनेमात दाखवण्यात आलं आहे. सिनेमात फक्त सकारात्मक गोष्टींना अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. आम्ही सिनेमाला राजकारणापासून दूर ठेवलं आहे…’ असं देखील सनेमाचे लेखक दिपक किंगरानी म्हणाले आहेत…

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा